शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

"आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचे परिवर्तन होणार नाही"

By मुरलीधर भवार | Updated: November 11, 2023 21:41 IST

केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया

कल्याण- भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी काल अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी आमदार गणपत गायकवाड आणि महापालिका आयुक्त दोघांशी बोलणार आहेत. आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत ,समन्वय असणे एक गरजेचा आहे. काही वैयक्तिक वाद असेल तर ते बाजूला ठेवावेत. आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचं परिवर्तन होणार नाही. ते पुन्हा एकत्र जोमाने कामाने लागतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पाटील यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वतः सुद्धा शेतकरी आहे. माझ्या देखील पिकाचे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्या अशी मागणी केली आहे.काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बिहारमध्ये विधानसभेत ७५ टक्के आरक्षण मंजूर केले जाते. तर ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा सवाल केला होता . याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली . केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, आपण जेव्हा ५० ट्क्केच्या वर आरक्षण देतो तेव्हा त्या आरक्षण संविधानाला धरून दिले. पाहिजे ज्या समाजाला तुम्ही आरक्षण देता. तो समाज मागास आहे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची असते, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले त्यावेळेस दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने अशोक चव्हाण ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारला ते टिकवता आलं नाही. आता बिहार सरकारने केले. त्यांनी काय कारणे दिलेत, कुठल्या समाजाला दिले आणि ते समाज मागास आहेत का? हे अजून ठरवायचे आहे.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या वतीने मतदारसंघातील पन्नास हजार कुटुंबांना मोफत शिधावाटप करण्यात आले. यानंतर मंत्री पाटील यांनी मी जेव्हा खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा मला जितका आनंद झाला नाही , तितका आनंद या कुटुंबांसोबत दिवाळी साजरा करताना झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे.