शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पालिकेची तिजोरी भरणारे उकाड्याने त्रस्त; एसी बंद असल्याने कोंडी

By पंकज पाटील | Updated: March 30, 2023 18:07 IST

एसी बंद असल्याने नागरिक -अधिकाऱ्यांची झालीये कोंडी

पंकज पाटील 

अंबरनाथ - घरपट्टीच्या माध्यमातून पालिकेची आर्थिक तिजोरी भक्कम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इमारत देखणी झाली असली तरी त्या इमारतीमध्ये घरपट्टी विभागाचीच एसी बंद असल्याने कर्मचाऱ्यांसह कर भरणाऱ्या नागरिकांना देखील गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. अंबरनाथ नगरपालिकेने तब्बल 45 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्वात आधी घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले. 

इमारतीत सर्वात आधी तळमजल्यावर असलेला घरपट्टी विभागातील कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात आले होते. हे कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पालिकेतील इतर कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले. मात्र नव्या प्रशासकीय इमारतीमधील जे कार्यालय सर्वात आधी स्थलांतरित झाले त्याच कार्यालयामध्ये आता नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. जे कार्यालय नंतर सुरू करण्यात आले त्या कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र घरपट्टी विभागातील वातानुकूलित यंत्रणा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. मार्च अखेर असल्यामुळे या घरपट्टी विभागात शेकडोच्या संख्येने नागरिक घरपट्टी भरण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दोन ते तीन तास रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना देखील एसी नसल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी एसीची यंत्रणा असताना देखील ती अद्यापही सुरू न झाल्याने नागरिकांना देखील आहे त्या स्थितीतच कर भरून निघून जावे लागत आहे.

नागरिकांसोबतच या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याच गर्मीचा त्रास गेल्या अनेक दिवसांपासून सहन करावा लागत आहे. घरपट्टीसाठी भरण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा उकाडा आणखीनच वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांना घाम पुसतच या ठिकाणी पालिकेची आर्थिक तिजोरी भक्कम करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता एसी का चालू नाही त्याची आपल्याला माहिती नसल्याचे प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे. घरपट्टी विभागातील वातानुकूलित यंत्रणा का सुरू झाली नाही याची माहिती आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथMuncipal Corporationनगर पालिका