शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा - आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

By प्रशांत माने | Updated: June 19, 2024 13:55 IST

शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते.

कल्याण: विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांशी जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहावे. शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी केले.

शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते. त्यावेळी उपस्थित शिक्षक वर्गाला संबोधित करताना आयुक्त जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. चर्चा सत्राच्या सुरूवातीला बदलते शैक्षणिक धोरण व त्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न याबाबतची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. आपण ज्ञानप्रचुर असणे व विद्यार्थी घडविणे, हे शिक्षकांचे सर्वात महत्वाचे काम आहे, असेही विचार त्यांनी मांडले. 

यावेळी व्यासपीठावर महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहीणी लोकरे, शिक्षण अधिकारी व्ही. व्ही. सरकटे उपस्थित होते. ‘शिक्षणाची नवी दिशा’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित केलेल्या शैक्षणिक सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यात मुंबई विदयापीठाचे माजी कुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे डॉ.नरेश चंद्र यांनी नविन शैक्षणिक धोरणाबाबत सखोल माहिती उपस्थित शिक्षक वर्गास दिली आणि या चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल महापालिका आयुक्तांचे आभार मानीत, महापालिकेच्या शाळा या शहरासाठी अभिमान ठराव्यात अशा आशावाद व्यक्त केला. 

आर के टी महाविद्यालयाच्या माधवी निकम यांनी सामाजिक संस्थाद्वारे (ग्रामीण भागातील) शाळांचा विकास या विषयाबाबत माहितीपूर्ण विवेचन केले. तर कल्याण (पूर्व) येथील आर्य गुरुकुल या शाळेच्या दिव्या बोरसे यांनी शाळांमध्ये/शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या विषयाबाबत उपस्थितांना माहिती दिली. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी पर्यावरण शाळेविषयी माहिती दिली. योगप्रशिक्षक विणा निमकर, नाट्य प्रशिक्षक रश्मी घुले, आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे निहार भोसले, कृतिका सकपाळ, प्रज्ञा वाघ, राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुर आहेर, लोकमतचे प्रशांत माने आणि कल्याण कला आध्यापक संघाचे विनोद शेलकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. महापालिका शाळेतील शिक्षक शहाआलम मिर्झा यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :kalyanकल्याण