शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा - आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

By प्रशांत माने | Updated: June 19, 2024 13:55 IST

शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते.

कल्याण: विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांशी जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहावे. शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी केले.

शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते. त्यावेळी उपस्थित शिक्षक वर्गाला संबोधित करताना आयुक्त जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. चर्चा सत्राच्या सुरूवातीला बदलते शैक्षणिक धोरण व त्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न याबाबतची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. आपण ज्ञानप्रचुर असणे व विद्यार्थी घडविणे, हे शिक्षकांचे सर्वात महत्वाचे काम आहे, असेही विचार त्यांनी मांडले. 

यावेळी व्यासपीठावर महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहीणी लोकरे, शिक्षण अधिकारी व्ही. व्ही. सरकटे उपस्थित होते. ‘शिक्षणाची नवी दिशा’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित केलेल्या शैक्षणिक सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यात मुंबई विदयापीठाचे माजी कुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे डॉ.नरेश चंद्र यांनी नविन शैक्षणिक धोरणाबाबत सखोल माहिती उपस्थित शिक्षक वर्गास दिली आणि या चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल महापालिका आयुक्तांचे आभार मानीत, महापालिकेच्या शाळा या शहरासाठी अभिमान ठराव्यात अशा आशावाद व्यक्त केला. 

आर के टी महाविद्यालयाच्या माधवी निकम यांनी सामाजिक संस्थाद्वारे (ग्रामीण भागातील) शाळांचा विकास या विषयाबाबत माहितीपूर्ण विवेचन केले. तर कल्याण (पूर्व) येथील आर्य गुरुकुल या शाळेच्या दिव्या बोरसे यांनी शाळांमध्ये/शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या विषयाबाबत उपस्थितांना माहिती दिली. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी पर्यावरण शाळेविषयी माहिती दिली. योगप्रशिक्षक विणा निमकर, नाट्य प्रशिक्षक रश्मी घुले, आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे निहार भोसले, कृतिका सकपाळ, प्रज्ञा वाघ, राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुर आहेर, लोकमतचे प्रशांत माने आणि कल्याण कला आध्यापक संघाचे विनोद शेलकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. महापालिका शाळेतील शिक्षक शहाआलम मिर्झा यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :kalyanकल्याण