शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कल्याण पूर्वेतील लोकग्राममधील नाल्याची संरक्षक भिंत बांधण्याचा प्रश्न अधांतरीच

By मुरलीधर भवार | Updated: February 15, 2024 17:21 IST

कल्याण पूर्वेतील लोकग्राम येथील मोठ्या नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात पडली आहे. ही भिंत पुन्हा बांधण्यात आलेली नाही.

मुरलीधर भवार, कल्याण : पूर्वेतील लोकग्राम येथील मोठ्या नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात पडली आहे. ही भिंत पुन्हा बांधण्यात आलेली नाही. नाल्याची भिंत कोसळली आहे. तर नाल्यालगतच्या फूटपाथवरुन शाळकरी मुले ये जा करतात. भिंत नसल्याने एखादा विद्यार्थी नाल्यात पडून अपघात हाेऊ शकतो अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्या पूर्वी ही संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

लोकग्रामचा नाला मोठा आहे. हा नाला कल्याण खाडीला जाऊन मिळतो. लोकग्रामही सुनियोजित लोकवसाहत आहे. या लोकवस्तीतून जाणाऱ््या रस्त्याचे विकास काम सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्ते विकास कामावर जवळपास १० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. रस्त्याचे विकास काम सुरु असल्याने नागरीक आणि विशेषत: शाळकरी मुले नाल्यालगत असलेल्या फूटपाथवरुन ये जा करतात. 

नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावळ्यात काेसळली आहे. संरक्षक भिंत नसल्याने नाल्याच्या फूटपाथवरुन ये जा करणारे विद्यार्थी नाल्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ही भिंत महापालिकेने बांधणे गरजेचे आहे. मात्र रस्त्याचे काम एमएमआरडीए करीत असल्याने हे काम एमएमआरडीएने करावे असे महापालिकेचे म्हणणे आहे. तर एमएमआरडीएनेकडून सांगितले जात आहे की, त्यांची केवळ रस्ता विकसीत करण्याची जबाबदारी आहे. 

संरक्षक भिंत बांधणे हे महापालिकेचे काम आहे. या वादात संरक्षक भिंत बांधण्याचा विषय अधांतरीच आहे. शाळकरी मुले आणि पादचारी यांच्या जिवित सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने ही संरक्षक भिंत पावसाळ्यापूर्वी बांधावी अशी मागणी माजी नगरसेवक शेट्टी यांनी महापालिका आयुक्त जाखड यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका