शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कल्याण पूर्वेतील लोकग्राममधील नाल्याची संरक्षक भिंत बांधण्याचा प्रश्न अधांतरीच

By मुरलीधर भवार | Updated: February 15, 2024 17:21 IST

कल्याण पूर्वेतील लोकग्राम येथील मोठ्या नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात पडली आहे. ही भिंत पुन्हा बांधण्यात आलेली नाही.

मुरलीधर भवार, कल्याण : पूर्वेतील लोकग्राम येथील मोठ्या नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात पडली आहे. ही भिंत पुन्हा बांधण्यात आलेली नाही. नाल्याची भिंत कोसळली आहे. तर नाल्यालगतच्या फूटपाथवरुन शाळकरी मुले ये जा करतात. भिंत नसल्याने एखादा विद्यार्थी नाल्यात पडून अपघात हाेऊ शकतो अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्या पूर्वी ही संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

लोकग्रामचा नाला मोठा आहे. हा नाला कल्याण खाडीला जाऊन मिळतो. लोकग्रामही सुनियोजित लोकवसाहत आहे. या लोकवस्तीतून जाणाऱ््या रस्त्याचे विकास काम सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्ते विकास कामावर जवळपास १० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. रस्त्याचे विकास काम सुरु असल्याने नागरीक आणि विशेषत: शाळकरी मुले नाल्यालगत असलेल्या फूटपाथवरुन ये जा करतात. 

नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावळ्यात काेसळली आहे. संरक्षक भिंत नसल्याने नाल्याच्या फूटपाथवरुन ये जा करणारे विद्यार्थी नाल्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ही भिंत महापालिकेने बांधणे गरजेचे आहे. मात्र रस्त्याचे काम एमएमआरडीए करीत असल्याने हे काम एमएमआरडीएने करावे असे महापालिकेचे म्हणणे आहे. तर एमएमआरडीएनेकडून सांगितले जात आहे की, त्यांची केवळ रस्ता विकसीत करण्याची जबाबदारी आहे. 

संरक्षक भिंत बांधणे हे महापालिकेचे काम आहे. या वादात संरक्षक भिंत बांधण्याचा विषय अधांतरीच आहे. शाळकरी मुले आणि पादचारी यांच्या जिवित सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने ही संरक्षक भिंत पावसाळ्यापूर्वी बांधावी अशी मागणी माजी नगरसेवक शेट्टी यांनी महापालिका आयुक्त जाखड यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका