शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

१८ गावे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीतील सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता

By मुरलीधर भवार | Updated: February 2, 2023 20:34 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेवर उद्या ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका आणि राज्य सरकारने दोन विनंती अर्ज न्यायालयाच्या रजिस्टारकडे सादर केल्याने उद्याची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भातील माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे. २७ गावातून १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका पाटील यांनी दाखल करीत १८ गावे वगळण्या येऊ नये अशी मागणी केली आहे. या याचिकेवर ९ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकार आणि महापालिकेने ठळक मुद्यांचे दोन पानी टिपण न्यायालयास सादर करावे असे न्यायालयाने आदेशित केले होते. या याचिकेवर अंतिम सुनावणी घेऊन ही याचिका निकाली काढली जाईल असे संकेत न्यायालयाने दिले होते. यासंदर्भात उद्या ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होती. तत्पूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेने न्यायालयाच्या रसिस्टाकडे पत्र दिले आहे की, या प्रकरणातील काही अतिरिक्त कादगपत्रे न्यायालयास सादर करायची आहे. त्यासाठी चार आठवडय़ाचा वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही काही मार्गदर्शन घ्याचचे आहे. याशिवाय आणखीन एक अतिरिक्त सत्यप्रतिज्ञा पत्र न्यायालयास सादर करावयाचे आहे. त्याकरीता दोन आठवडय़ाची वेळ न्यायालयाकडे मागितली आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या या दोन अर्ज वजा पत्रांमुळे उद्याची सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :kalyanकल्याण