शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

एनआरसी कंपनीबाबत सरकारने सुवर्णमध्य काढावा, आमदारांनी अधिवेशनात केली मागणी

By मुरलीधर भवार | Updated: March 16, 2023 18:15 IST

एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली.

कल्याण : मोहने आंबिवलीनजीक बंद असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांना अद्याप त्यांची देणी मिळालेली नाही. त्यामुळे अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या. तर अनेकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांची देणी देण्यासंदर्भात सरकारने सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे. 

एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली. कंपनी 2क्क्9 साली बंद करण्यात आली. तेव्हापासून कंपनीतील कामगारांना त्यांची थकीत देणी दिली गेलेली नाही. दरम्यान कंपनीची 425 एकर जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली. कंपनी कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनलकडे न्याय प्रविष्ट आहे. कामगारांनी आंदोलने केली आहेत. मात्र त्यांची देणी अद्याप मिळालेली नाही. 

कामगारांच्या आंदोलनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्यक्ष भेट देऊन कामगारांच्या पाठीसी असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने कामगार आणि कंपनी यांच्या सुवर्णमध्य साधून एनआरसी कंपनीच्या कामगारांची देणी देण्यावर तोडगा काढावा अशी मागणी आमदार भोईर यांनी अधिवेशनात केली आहे. 

दरम्यान कल्याण पश्चिमेत बाजारपेठ, खडकपाडा, महात्मा फुले ही तीन पोलिस ठाणी तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांची कार्यालये आहे. स्टेशन परिसरातील महात्मा फुले पोलिस ठाणो खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. सध्या सहाय्यक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आणि वाहतूक पोलिस नियंत्रण उपायुक्त आणि अधिकारी वर्गाचे कार्यालय एका ठिकाणी आहे. सध्याची इमारत जीर्ण झाली आहे. दोन कार्यालये तर चाळवजा वास्तूत आहे. त्या वास्तूही जिर्ण झालेल्या आहे. त्याच जागेत एकाच ठिकाणी सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक नियंत्रम शाखा आणि महात्मा फुले पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत उभारली जावी. त्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी देखील आमदार भोईर यांनी अधिवेशनात केली आहे. 

आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाणी प्रश्नावर उठविला आवाजकल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत नागरीकरण होत असल्याने पाण्याची समस्या उद्धवते. पाणी टंचाई विषयी लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांकडून मला विचारणा केली जाते. मात्र अधिकारी वर्गाकडून ठराविक उत्तरे देऊन नागरीकांची बोळवण केली जात असल्याचा मुद्दा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. तसेच कल्याणसाठी पाणी पुरवठा योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण