शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

एनआरसी कंपनीबाबत सरकारने सुवर्णमध्य काढावा, आमदारांनी अधिवेशनात केली मागणी

By मुरलीधर भवार | Updated: March 16, 2023 18:15 IST

एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली.

कल्याण : मोहने आंबिवलीनजीक बंद असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांना अद्याप त्यांची देणी मिळालेली नाही. त्यामुळे अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या. तर अनेकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांची देणी देण्यासंदर्भात सरकारने सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे. 

एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली. कंपनी 2क्क्9 साली बंद करण्यात आली. तेव्हापासून कंपनीतील कामगारांना त्यांची थकीत देणी दिली गेलेली नाही. दरम्यान कंपनीची 425 एकर जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली. कंपनी कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनलकडे न्याय प्रविष्ट आहे. कामगारांनी आंदोलने केली आहेत. मात्र त्यांची देणी अद्याप मिळालेली नाही. 

कामगारांच्या आंदोलनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्यक्ष भेट देऊन कामगारांच्या पाठीसी असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने कामगार आणि कंपनी यांच्या सुवर्णमध्य साधून एनआरसी कंपनीच्या कामगारांची देणी देण्यावर तोडगा काढावा अशी मागणी आमदार भोईर यांनी अधिवेशनात केली आहे. 

दरम्यान कल्याण पश्चिमेत बाजारपेठ, खडकपाडा, महात्मा फुले ही तीन पोलिस ठाणी तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांची कार्यालये आहे. स्टेशन परिसरातील महात्मा फुले पोलिस ठाणो खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. सध्या सहाय्यक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आणि वाहतूक पोलिस नियंत्रण उपायुक्त आणि अधिकारी वर्गाचे कार्यालय एका ठिकाणी आहे. सध्याची इमारत जीर्ण झाली आहे. दोन कार्यालये तर चाळवजा वास्तूत आहे. त्या वास्तूही जिर्ण झालेल्या आहे. त्याच जागेत एकाच ठिकाणी सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक नियंत्रम शाखा आणि महात्मा फुले पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत उभारली जावी. त्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी देखील आमदार भोईर यांनी अधिवेशनात केली आहे. 

आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाणी प्रश्नावर उठविला आवाजकल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत नागरीकरण होत असल्याने पाण्याची समस्या उद्धवते. पाणी टंचाई विषयी लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांकडून मला विचारणा केली जाते. मात्र अधिकारी वर्गाकडून ठराविक उत्तरे देऊन नागरीकांची बोळवण केली जात असल्याचा मुद्दा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. तसेच कल्याणसाठी पाणी पुरवठा योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण