शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

कल्याण ग्रामीण भागातील अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाचा स्थायी समिती माजी सभापतीनी घेतला आढावा

By मुरलीधर भवार | Updated: May 9, 2023 16:36 IST

कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा आणि मानपाडा या गावांमध्ये केंद्र सरकारच्या याेजने अंतर्गत अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

कल्याण-कल्याण ग्रामीण भागात स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करीत आढावा घेतला. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली. या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले

कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा आणि मानपाडा या गावांमध्ये केंद्र सरकारच्या याेजने अंतर्गत अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. अमृत योजने अंतर्गत प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र जलकुंभ बांधून देण्यात येणार आहे. पाणी साठविणारे जलकुंभ उभे राहिल्यावर भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या कल्याण ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने येते. त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित केली असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.

कल्याण ग्रामीणमधील पाण्याचा प्रश्न येत्या ४ महिन्यात सोडविण्यात येईल अशी ग्वाही यावेळी याेजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने यावेळी दिली. यावेळी माजी नगरसेवक जालिंदर पाटील , नकुल गायकर , मुकेश पाटील कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे शैलेश कुलकर्णी ,योगेश म्हात्रे , आशु सिंह , मुकेश भोईर स्वप्निल विटकर, पवन म्हात्रे, अक्षय गायकर आणि सचीन कासार आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :kalyanकल्याण