शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कल्याण ग्रामीण भागातील अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाचा स्थायी समिती माजी सभापतीनी घेतला आढावा

By मुरलीधर भवार | Updated: May 9, 2023 16:36 IST

कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा आणि मानपाडा या गावांमध्ये केंद्र सरकारच्या याेजने अंतर्गत अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

कल्याण-कल्याण ग्रामीण भागात स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करीत आढावा घेतला. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली. या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले

कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा आणि मानपाडा या गावांमध्ये केंद्र सरकारच्या याेजने अंतर्गत अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. अमृत योजने अंतर्गत प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र जलकुंभ बांधून देण्यात येणार आहे. पाणी साठविणारे जलकुंभ उभे राहिल्यावर भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या कल्याण ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने येते. त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित केली असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.

कल्याण ग्रामीणमधील पाण्याचा प्रश्न येत्या ४ महिन्यात सोडविण्यात येईल अशी ग्वाही यावेळी याेजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने यावेळी दिली. यावेळी माजी नगरसेवक जालिंदर पाटील , नकुल गायकर , मुकेश पाटील कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे शैलेश कुलकर्णी ,योगेश म्हात्रे , आशु सिंह , मुकेश भोईर स्वप्निल विटकर, पवन म्हात्रे, अक्षय गायकर आणि सचीन कासार आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :kalyanकल्याण