शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कल्याण दुर्गाडी परिसरातील आरमार स्मारकाची सेवानिवृत् व्हाॅईस अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी केली पाहणी

By मुरलीधर भवार | Updated: November 10, 2022 16:42 IST

कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे.

कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे. या स्मारकाची पाहणी नाैसेनेचे सेवानिवृत्त अॅडमिरल एस. व्ही. भाेकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित हाेते. 4 डिसेंबर राेजी नाैसेना दिनी या स्मारकाचे लाेकार्पण करण्यात येणार आहे.

स्मारक स्वरुपात युध्द नौका टी-८० विराजमान करण्याबाबत नौदल आणि कल्याण डाेंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. आज करण्यात आलेल्या पाहणी प्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थीत हाेते.उपायुक्तछत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यानजीक मराठा आरमाराची सुरुवात केली.त्याच खाडी किनाऱ्यचा विकास केला जात आहे. त्याच एक भाग म्हणून इथे नौदल संग्रहालय उभारले जात आहे. त्याचा आराखडा भारतीय नौसेनेच्या सबमरीननुसार तयार केला आहे.

सुमारे १११ मी. लांब असलेल्या या सबमरीनच्या संग्रहालयात १७ ते १८ व्या शतकापर्यंत मराठा योध्यांच्या आरमारांचा इतिहास आणि ब्रिटीशांच्या रॉयल नेव्हींपासून स्वतंत्र भारताच्या नौसेनेचा आजपर्यंत इतिहास प्रसिध्द केला जाईल. हा इतिहास पेंटींग, शिल्प, मॉडेल व मल्टीमिडियाच्या स्वरुपात आहे. भारताच्या अरिहंत या पहिल्या पाणबुडीवरुन प्रेरीत होऊन या सबमरीनसचा आराखडा बनवण्यात आला आहे,अशी माहिती एसकेडीसीएल चे हेरिटेज व्यवस्थापन सल्लागार सचिन सावंत यांनी दिली. या प्रकल्पाची संकल्पना महापालिकेचे माजी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती.

महानगरपालिकेने आरमार रुपी स्मारक उभारण्यासाठी खुप चांगलं ठिकाण निवडलं आहे ,या माध्यमातून पर्यटकांना व विदयार्थ्यांना नौदलाच्या तसेच शिवकालीन इतिहासाबाबत माहिती उपलब्ध होईल आणि महापालिका युध्द नौकेच्या स्वरुपात उभारत असलेल्या स्मारकाच्या रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतील इतिहास पुन्हा जिवंत स्वरुपात सर्वांसमोर उभा राहील असे भोकरे यांनी सांगितले.

४ डिसेंबर १९७१ मध्ये भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून संपूर्ण बंदर उध्वस्त केले होते आणि पूर्व पाकिस्तानातून पश्चिम पाकिस्तानात जाणारी जलवाहतूक पूर्णपणे बंद केली होती. ज्याचा परिणाम म्हणून जमिनीवर पश्चिम पाकिस्तानला कोणतीही मदत मिळू शकली नाही. ज्यामुळे भारतीय लष्कराने १९७१ चे युद्ध एकहाती जिंकल्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. त्या दिवसाचे स्मरण म्हणून भारतीय नौसेना ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनी लोकार्पण प्रस्तावित करण्यात आले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण