शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

कल्याण दुर्गाडी परिसरातील आरमार स्मारकाची सेवानिवृत् व्हाॅईस अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी केली पाहणी

By मुरलीधर भवार | Updated: November 10, 2022 16:42 IST

कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे.

कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे. या स्मारकाची पाहणी नाैसेनेचे सेवानिवृत्त अॅडमिरल एस. व्ही. भाेकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित हाेते. 4 डिसेंबर राेजी नाैसेना दिनी या स्मारकाचे लाेकार्पण करण्यात येणार आहे.

स्मारक स्वरुपात युध्द नौका टी-८० विराजमान करण्याबाबत नौदल आणि कल्याण डाेंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. आज करण्यात आलेल्या पाहणी प्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थीत हाेते.उपायुक्तछत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यानजीक मराठा आरमाराची सुरुवात केली.त्याच खाडी किनाऱ्यचा विकास केला जात आहे. त्याच एक भाग म्हणून इथे नौदल संग्रहालय उभारले जात आहे. त्याचा आराखडा भारतीय नौसेनेच्या सबमरीननुसार तयार केला आहे.

सुमारे १११ मी. लांब असलेल्या या सबमरीनच्या संग्रहालयात १७ ते १८ व्या शतकापर्यंत मराठा योध्यांच्या आरमारांचा इतिहास आणि ब्रिटीशांच्या रॉयल नेव्हींपासून स्वतंत्र भारताच्या नौसेनेचा आजपर्यंत इतिहास प्रसिध्द केला जाईल. हा इतिहास पेंटींग, शिल्प, मॉडेल व मल्टीमिडियाच्या स्वरुपात आहे. भारताच्या अरिहंत या पहिल्या पाणबुडीवरुन प्रेरीत होऊन या सबमरीनसचा आराखडा बनवण्यात आला आहे,अशी माहिती एसकेडीसीएल चे हेरिटेज व्यवस्थापन सल्लागार सचिन सावंत यांनी दिली. या प्रकल्पाची संकल्पना महापालिकेचे माजी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती.

महानगरपालिकेने आरमार रुपी स्मारक उभारण्यासाठी खुप चांगलं ठिकाण निवडलं आहे ,या माध्यमातून पर्यटकांना व विदयार्थ्यांना नौदलाच्या तसेच शिवकालीन इतिहासाबाबत माहिती उपलब्ध होईल आणि महापालिका युध्द नौकेच्या स्वरुपात उभारत असलेल्या स्मारकाच्या रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतील इतिहास पुन्हा जिवंत स्वरुपात सर्वांसमोर उभा राहील असे भोकरे यांनी सांगितले.

४ डिसेंबर १९७१ मध्ये भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून संपूर्ण बंदर उध्वस्त केले होते आणि पूर्व पाकिस्तानातून पश्चिम पाकिस्तानात जाणारी जलवाहतूक पूर्णपणे बंद केली होती. ज्याचा परिणाम म्हणून जमिनीवर पश्चिम पाकिस्तानला कोणतीही मदत मिळू शकली नाही. ज्यामुळे भारतीय लष्कराने १९७१ चे युद्ध एकहाती जिंकल्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. त्या दिवसाचे स्मरण म्हणून भारतीय नौसेना ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनी लोकार्पण प्रस्तावित करण्यात आले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण