शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

By मुरलीधर भवार | Updated: December 8, 2022 21:23 IST

आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य.

कल्याण: भाजपा आणि टीम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राचा अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रकार ठरवून सुनियोजनाचा भाग आहे. हे षडयंत्र  देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवेंद्रजी सभागृहात साधा निंदा जनक प्रस्ताव देखील मांडत नाहीत. गुजरातच्या निवडणूक सुरू असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरात मध्ये स्थलांतरित करायचे. कर्नाटकाच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हटलं की महाराष्ट्रातले गाव कर्नाटकला जोडण्याचा प्रयत्न करायचा हे फार वाईट आहे. आजपर्यंत भाजपने जाती जातीत भांडत लावत होते. धर्मा धर्मात भांडण लावत होता. आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे. याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  केला आहे.

महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या आधी नेत्या अंधारे यांनी उपरोक्त आरोप केला आहे. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ वापरावा लागतो यातच आमचा विजय आहे असे अंधारे यांनी सांगितले.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी संजय राऊत चिथा वणीकर भाषण देतात असा आरोप केला होता याबाबत बोलताना अंधारे यांनी बावनकुळे साहेब जर असं नाही बोलले तर त्यांचा प्रदेशाध्यक्ष पद जाऊ शकतो. महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि महाराष्ट्र चाले अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी असच बोलले पाहिजेत. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे. तुम्ही काही बोलला तर आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो. बावनकुळेंच्या बोलण्याचा मला फार काही विशेष वाटत नाही.

महाप्रबोधन यात्रेबाबत शिंदे गटाकडून सातत्याने टीका केली जाते याबाबत बोलताना अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रा सूनियोजित पक्षाचा कार्यक्रम आहे मात्र शिंदे गटाने पैसा प्रचंड पेरला. प्रचंड माणसं तोडली मात्र एवढी सगळी माणसं तोडून सुद्धा अजेंड्यावर काम करायला एकही माणूस नाही. म्हणजे सगळं गाव मामाचा एक नाही कामाचा अशी त्यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करण्यास एकही माणूस नसेल तर त्यांचा दोष काय पैशांवर माणसं विकत घेता येऊ शकतात. पैशावर बुद्धी आणि निष्ठा विकत घेता येऊ शकत नाही असे अंधारे सांगितले.

संजय राऊत यांची सुरक्षा काढल्या बाबत बोलताना अंधारे यांनी त्यांच्या हातात सत्ता आहे तर कोणावर कसे ही आत टाकू शकतात. कोणाचीही सुरक्षा काढून घेऊ शकतात. त्यांच्याच पक्षातील लोकांकडून ज्यांना रेडे बोलले आहे. त्यांना सुरक्षा पुरवू शकतात..रेड्यांना सुरक्षा द्यायची आणि माणसांची सुरक्षा काढायची हे सगळं त्यांचं चालत राहील असा टोला शिंदे गटाला लगावाला.

मनसे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर घे रेशन आणि कर भाषण अशी टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना अंधारे यांनी इलका तुम्हारा धमाका हमारा ,पाठीमागून बोलायला आवडत नाही राजू पाटील यांची हौस पूर्ण करेन असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याकडे टोमणास्त्र आहे अशी टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना अंधारे यांनी तो त्यांच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. मुळात लेकी बोले सूने लागे असे त्यांना का वाटते. उद्धवजी जे बोलत आहे त्यांच्यासाठी आहे असं त्यांना वाटतं याचा अर्थ असा आहे तीर बहुत सही निशाने पे लगा है असा टोला देवेंद्र फडणवीस यांना अंधारे यांनी लगावला.

महाराष्ट्र पाकिस्तानात नाही कर्नाटक पाकिस्तानच नाही तरीसुद्धा ते गलिच्छ राजकारण ज्या पद्धतीचे केले जाते त्यामुळे दोन राज्यात वितुष्टवाद वाढतोय. आता राज्यातही तुमची सत्ता केंद्रातही तुमची सत्ता आहे. आमचे एकनाथ भाऊ आम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी निघालो आहोत, असे बोलत होते. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान होतो. अस्मिता पायदळी तुडवला जाते. गावेच्या गावे ओढली जातात हे सगळं होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अगदी गप्प घर बसलेले असतात कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे राज्याची बाजू मांडतात एकनाथ भाऊ बाजू मांडण्यासाठी दिल्लीश्वराची परमिशन मिळाली नाही का? कदाचित परमिशन देण्याचे ते वाट पाहतात का असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.

पत्रकारांमधूनच प्रश्न विचारले जातात. राव तर नंतर सुषमा अंधारे यांचा नंबर आहे. कशासाठी नंबर असेल? माझ्यावर लावता येत नाही म्हणून खोट्या केस टाकल्या जाणार आहेत का? माझा घात केला जाणार आहे का? अपघातात मला भीती आहे का? माझा एखादा अपघात घडवून आणू शकतो का? जे करायचे ते करा. भय भ्रम चरित्र हत्या ही सगळे अस्त्र वापरून झाली. आहेत याचा पलीकडे काही असतील तर ते काढून बघा असे आव्हान शिंदे गटासह भाजपाला अंधारे यांनी केले आहे.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे