शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अशा वाढवता येतील लोकल फेऱ्या, रात्री ८ ते ८.४० मध्ये पाच लांबपल्यांच्या गाड्यांमुळे एकही जलद लोकल मुंबईतून नाही

By अनिकेत घमंडी | Updated: February 29, 2024 10:17 IST

कल्याण पुढे येणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्या या उपनगरी लोकल वाहतुकीला अडथळा होत आहेत, त्या गाड्या मुंबईपर्यन्त आणू नये ही प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

अनिकेत घमंडी

 डोंबिवली: कल्याण पुढे येणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्या या उपनगरी लोकल वाहतुकीला अडथळा होत आहेत, त्या गाड्या मुंबईपर्यन्त आणू नये ही प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. विशेषतः रात्री ८ ते ८. ४० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून कल्याण कडे जाणारी एकही जलद लोकल नाही. कारण त्या दरम्यान सीएसएमटी, दादरहून नागपूर दुरांतो, महालक्ष्मी एक्सप्रेस, नागरकाँइल एक्सप्रेस, दादर-हूबळी एक्स्प्रेस, दादर-तिरूनवेली एक्सप्रेस ह्या पाच गाड्या सुटतात. त्या गाड्यांच्या वेळात थोडा बदल करून दर दोन एक्सप्रेसमध्ये एक लोकल चालवणे शक्य असल्याचे मत रेल्वेच्या सेवानिवृत्त अधिकारी व प्रवासी समस्यांच्या जाणकार अभ्यासकांनी नोंदवले. पण त्यासाठी रेल्वे प्रशासनाची प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

अभ्यासकांनी रेल्वेने जाहीर।केलेल्या वेळापत्रकाचा आधार घेऊन ही मत मांडली असल्याचे सांगण्यात आले. मुंबईहून (सीएसएमटी)संध्याकाळी ५.१५ वा सुटणारी हावडा दुरांतो ही गाडी एलटीटीवरून सोडावी, ह्यामुळे ह्या गाडीच्या जागी एक जादा लोकल चालवता येईल. नाहूर येथील गुड्स यार्ड हल्ली फारसा वापरात नाही, त्यामुळे तेथे प्रवासी गाड्यांसाठी आवश्यक त्या सोयी निर्माण करून, त्या यार्डाचा उपयोग करून ठाणे स्टेशनातून काही एक्सप्रेस गाड्या चालवणे. दुरांतो एक्सप्रेसच्या धोरणात बदल करून, किमान मुंबई कडे येणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस, उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल, कल्याण, ठाणे, दादर स्टेशनात थांबवाव्यात. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी व सावंतवाडी ह्या दोन पँसेंजर दिवा स्टेशन ऐवजी दादरहून चालवाव्यात. वंदे भारत गाड्यां मध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून, कसारा व खंडाळा घाट चढू, उतरू शकणाऱ्या मेमू गाड्या बनवून सामान्य प्रवाशांसाठी मुंबई - पुणे, नाशिक दरम्यान स्थानिक गरजेनुसार फेऱ्या सुरू कराव्यात.

कोपर स्टेशनात मेल, एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी प्लँटफाँर्मच्या लांबी विस्तारसह आवश्यक त्या सोय करणे. एलटीटीमध्ये दोन जादा प्लँटफाँर्मचे काम पूर्ण झाल्यावर, सीएसएमटी व दादरहून सुटणाऱ्या/येणाऱ्या काही मेल/एक्सप्रेस एलटीटीवरून चालवणे. एलटीटीवरून दिवा वसई मार्गाने गुजरात, राजस्थान कडे एक्स्प्रेस गाड्या सुरू करणे. मुंबई - नांदेड राज्य राणी एक्सप्रेसचा ठाणे स्टेशनातील टेक्निकल हॉल्ट हा पँसेंजर हाँल्ट करावा. सर्व मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे स्टेशनात थांबण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.