शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डाेंबिवलीतील फेरीवाले हक्काच्या जागेपासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:19 IST

प्रशासनाकडून कृती नाही : वर्षभरापूर्वी काढली होती सोडत

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण :  गेल्यावर्षी १३ नोव्हेंबरला डोंबिवलीतील ग आणि फ प्रभागांत सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना सोडतीद्वारे जागांचे वाटप करण्यात आले होते. अंमलबजावणीअभावी प्रलंबित राहिलेले राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवायला केडीएमसीने उशिरा का होईना सुरुवात केली, अशी प्रतिक्रिया त्यावेळी उमटली होती. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात याबाबत ठोस कृती न झाल्याने हक्काच्या जागेपासून फेरीवाले अद्यापही वंचित राहिले आहेत.

फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण हा नेहमीच कल्याण-डोंबिवली शहरांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे. यात एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केल्यापासून फेरीवाले आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये कारवाईवरून नेहमीच संघर्ष घडले. यावर ‘केवळ कारवाई नको, आमच्या हक्काची जागा द्या’ अशी मागणी करताना फेरीवाल्यांकडून नेहमीच राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष वेधले जायचे. दरम्यान, प्रशासनाकडून थातूरमातूर सुरू असलेली कारवाई आणि फेरीवाल्यांचे वाढते प्रस्थ पाहता स्थानक परिसरातून वाट काढणे नागरिकांना जिकिरीचे बनले होते. यात गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान दोन फेरीवाल्यांच्या गटांत झालेली राडेबाजी पाहता तातडीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व्हावी, याकडे लक्ष वेधले होते.

रवींद्र चव्हाण यांनी तत्कालीन आयुक्तांना लिहिले हाेते खरमरीत पत्रn आमदार रवींद्र चव्हाण यांनीही तत्कालीन आयुक्त गोविंद बोडकेंना खरमरीत पत्र पाठवून फेरीवाला अतिक्रमण आणि राडेबाजीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रशासनाकडून धोरणाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला होता. n याअंतर्गत मागील वर्षी १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात फ प्रभागातील ५०३ व ग प्रभागातील ४१० फेरीवाल्यांना पाच शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते सोडतीद्वारे जागेचे वाटप केले होते. n त्यावेळी फेरीवाला संघटना आणि शहर फेरीवाला समितीच्या प्रतिनिधींनी आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले होते. यानंतर कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील क आणि ड प्रभागाला प्राधान्य दिले जाणार होते. n परंतु, त्यावेळी तत्परतेने अंमलबजावणी झाली नाही. त्यात मार्चपासून कोरोनाचे वाढलेले रुग्ण आणि त्यात लागू झालेला लॉकडाऊन पाहता ही प्रक्रिया पूर्णपणे थंड पडली.