शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

कल्याण-डाेंबिवलीतील फेरीवाले हक्काच्या जागेपासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:19 IST

प्रशासनाकडून कृती नाही : वर्षभरापूर्वी काढली होती सोडत

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण :  गेल्यावर्षी १३ नोव्हेंबरला डोंबिवलीतील ग आणि फ प्रभागांत सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना सोडतीद्वारे जागांचे वाटप करण्यात आले होते. अंमलबजावणीअभावी प्रलंबित राहिलेले राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवायला केडीएमसीने उशिरा का होईना सुरुवात केली, अशी प्रतिक्रिया त्यावेळी उमटली होती. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात याबाबत ठोस कृती न झाल्याने हक्काच्या जागेपासून फेरीवाले अद्यापही वंचित राहिले आहेत.

फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण हा नेहमीच कल्याण-डोंबिवली शहरांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे. यात एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केल्यापासून फेरीवाले आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये कारवाईवरून नेहमीच संघर्ष घडले. यावर ‘केवळ कारवाई नको, आमच्या हक्काची जागा द्या’ अशी मागणी करताना फेरीवाल्यांकडून नेहमीच राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष वेधले जायचे. दरम्यान, प्रशासनाकडून थातूरमातूर सुरू असलेली कारवाई आणि फेरीवाल्यांचे वाढते प्रस्थ पाहता स्थानक परिसरातून वाट काढणे नागरिकांना जिकिरीचे बनले होते. यात गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान दोन फेरीवाल्यांच्या गटांत झालेली राडेबाजी पाहता तातडीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व्हावी, याकडे लक्ष वेधले होते.

रवींद्र चव्हाण यांनी तत्कालीन आयुक्तांना लिहिले हाेते खरमरीत पत्रn आमदार रवींद्र चव्हाण यांनीही तत्कालीन आयुक्त गोविंद बोडकेंना खरमरीत पत्र पाठवून फेरीवाला अतिक्रमण आणि राडेबाजीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रशासनाकडून धोरणाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला होता. n याअंतर्गत मागील वर्षी १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात फ प्रभागातील ५०३ व ग प्रभागातील ४१० फेरीवाल्यांना पाच शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते सोडतीद्वारे जागेचे वाटप केले होते. n त्यावेळी फेरीवाला संघटना आणि शहर फेरीवाला समितीच्या प्रतिनिधींनी आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले होते. यानंतर कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील क आणि ड प्रभागाला प्राधान्य दिले जाणार होते. n परंतु, त्यावेळी तत्परतेने अंमलबजावणी झाली नाही. त्यात मार्चपासून कोरोनाचे वाढलेले रुग्ण आणि त्यात लागू झालेला लॉकडाऊन पाहता ही प्रक्रिया पूर्णपणे थंड पडली.