शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गर्दीच्या वेळेत ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा सुरू करा रेल्वेमंत्र्यांकडे प्रवासी संघटनेने मांडले बदलापूरच्या प्रवाशांचे गार्हाणे

By अनिकेत घमंडी | Updated: February 27, 2024 13:25 IST

२० मिनिटांनी गाड्या, महिला विशेष, १५डबा लोकलची मागणी बैठक घेऊन चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन

 डोंबिवली: बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्या स्थानकातून रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे, तेथून प्रतिदिन सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. असे गाडया मात्र त्या तुलनेने अपुऱ्या पडतात, मधल्यावेळेला एक तास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अंबरनाथच्या पुढे बदलापूर, कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना लोकल नाहीत. गर्दीच्या वेळेत ठाणे कर्जत, कसारा मार्गावर शटल गाड्या सोडाव्यात. अशी मागणी करत उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना गार्हाणे मांडले.

सोमवारी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात वाढते नागरीकरण लक्षात घेऊन २० मिनिटांच्या फरकाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बदलापूर कर्जतला जाणाऱ्या लोकल हव्यात. मेस्त्री दानवेना म्हणाले की, महिलांसाठी सकाळी बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर अशी महिलांसाठी खास लोकल सोडावी. कर्जत ते वशी, पनवेल,कसारा ते वासी (व्हाया पनवेल) लोकल चालू करा. बदलापूर येथे फलाट क्रमांक एक व दोन वर शौचालय नसल्यामुळे प्रवाशांना फलाट क्रमांक ३ वर यावे लागते,तरी फलाट क्रमांक एक व दोन वर शौचालय बांधून प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी. बदलापूरमध्ये दुपारी दोन वाजेपर्यत असणारी आरक्षण खिडकी पूर्ण वेळ करण्यात यावी व चौकशी खिडकी चालू करण्यात यावी. उपनगरीय लोकल गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सध्या आहेत त्या लोकलची प्रवासी वहन क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कसारा व कर्जत हे मार्ग दुहेरी असल्याने आम्ही या मार्गावर नव्या लोकल फेऱ्या वाढवू शकत नाही असे रेल्वे प्रशासन सांगत आहे. त्याचवेळी बदलापूर ते ठाणे या अंतरात अप आणि डाऊन दिशेकडे ओव्हर क्राऊड मुळे सर्वाधिक अपघाती बळी जात आहेत. यासाठी टिटवाळा व बदलापुर जास्तीतजास्त लोकल १५ डबा होणे अत्यावश्यक आहे.

४५० कोटी खर्चाचा हा प्रकल्प प्रकल्प रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी मागील सहा वर्षे प्रतिक्षेत आहे. प्रवाशांच्या सुखद सुरक्षित प्रवासासाठी हा प्रकल्प युद्धपातळीवर राबवावा असे।साकडे मेस्त्री यांनी घातल्याचे ते म्हणाले. तसेच एखादा अपघात झाल्यास बदलापूर रेल्वे स्थानकावर हमाल नाही, तरी स्थानकावर कायम स्वरुपी हमालाची नेमणूक करण्यात यावी. महिलांचा डबा,दिव्यागांचा डबा,कँन्सर पिडीतांचा डबा व माल डबा या सर्व डब्यांवर वेगवेगळे रंग दयावेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून व कल्याण दिशेकडून येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या डब्यांना आतून व बाहेरुन क्रमांक दयावेत जेणेकरून डब्यांमध्ये एखादी घटना घडल्यास रेल्वेच्या यंत्रणाशी संपर्क सांधण्यास मदत होईल. त्यावर दानवे यांनी बैठक घेऊन चर्चा करू, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले