शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

गर्दीच्या वेळेत ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा सुरू करा रेल्वेमंत्र्यांकडे प्रवासी संघटनेने मांडले बदलापूरच्या प्रवाशांचे गार्हाणे

By अनिकेत घमंडी | Updated: February 27, 2024 13:25 IST

२० मिनिटांनी गाड्या, महिला विशेष, १५डबा लोकलची मागणी बैठक घेऊन चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन

 डोंबिवली: बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्या स्थानकातून रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे, तेथून प्रतिदिन सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. असे गाडया मात्र त्या तुलनेने अपुऱ्या पडतात, मधल्यावेळेला एक तास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अंबरनाथच्या पुढे बदलापूर, कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना लोकल नाहीत. गर्दीच्या वेळेत ठाणे कर्जत, कसारा मार्गावर शटल गाड्या सोडाव्यात. अशी मागणी करत उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना गार्हाणे मांडले.

सोमवारी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात वाढते नागरीकरण लक्षात घेऊन २० मिनिटांच्या फरकाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बदलापूर कर्जतला जाणाऱ्या लोकल हव्यात. मेस्त्री दानवेना म्हणाले की, महिलांसाठी सकाळी बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर अशी महिलांसाठी खास लोकल सोडावी. कर्जत ते वशी, पनवेल,कसारा ते वासी (व्हाया पनवेल) लोकल चालू करा. बदलापूर येथे फलाट क्रमांक एक व दोन वर शौचालय नसल्यामुळे प्रवाशांना फलाट क्रमांक ३ वर यावे लागते,तरी फलाट क्रमांक एक व दोन वर शौचालय बांधून प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी. बदलापूरमध्ये दुपारी दोन वाजेपर्यत असणारी आरक्षण खिडकी पूर्ण वेळ करण्यात यावी व चौकशी खिडकी चालू करण्यात यावी. उपनगरीय लोकल गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सध्या आहेत त्या लोकलची प्रवासी वहन क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कसारा व कर्जत हे मार्ग दुहेरी असल्याने आम्ही या मार्गावर नव्या लोकल फेऱ्या वाढवू शकत नाही असे रेल्वे प्रशासन सांगत आहे. त्याचवेळी बदलापूर ते ठाणे या अंतरात अप आणि डाऊन दिशेकडे ओव्हर क्राऊड मुळे सर्वाधिक अपघाती बळी जात आहेत. यासाठी टिटवाळा व बदलापुर जास्तीतजास्त लोकल १५ डबा होणे अत्यावश्यक आहे.

४५० कोटी खर्चाचा हा प्रकल्प प्रकल्प रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी मागील सहा वर्षे प्रतिक्षेत आहे. प्रवाशांच्या सुखद सुरक्षित प्रवासासाठी हा प्रकल्प युद्धपातळीवर राबवावा असे।साकडे मेस्त्री यांनी घातल्याचे ते म्हणाले. तसेच एखादा अपघात झाल्यास बदलापूर रेल्वे स्थानकावर हमाल नाही, तरी स्थानकावर कायम स्वरुपी हमालाची नेमणूक करण्यात यावी. महिलांचा डबा,दिव्यागांचा डबा,कँन्सर पिडीतांचा डबा व माल डबा या सर्व डब्यांवर वेगवेगळे रंग दयावेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून व कल्याण दिशेकडून येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या डब्यांना आतून व बाहेरुन क्रमांक दयावेत जेणेकरून डब्यांमध्ये एखादी घटना घडल्यास रेल्वेच्या यंत्रणाशी संपर्क सांधण्यास मदत होईल. त्यावर दानवे यांनी बैठक घेऊन चर्चा करू, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले