शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

By मुरलीधर भवार | Updated: June 10, 2025 06:10 IST

रेल्वे अपघातात मृत्युमुखी अथवा जखमी झालेल्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला काडीमात्रही सहानुभूती नाही, अशा शब्दांत श्रीराम वैद्य यांनी संताप व्यक्त केला.

मुरलीधर भवार

डोंबिवली : रेल्वे अपघातात मृत्युमुखी अथवा जखमी झालेल्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला काडीमात्रही सहानुभूती नाही, अशा शब्दांत श्रीराम वैद्य यांनी संताप व्यक्त केला. रेल्वेच्या संवेदनशून्य कारभाराचा अनुभव वैद्य गेली सात वर्षे घेत आहेत. त्यांची मुलगी तेजश्री हिचा धावत्या गाडीतून पडून अपघात झाला. त्यात ती गंभीर जखमी झाली. सात वर्षांपासून ती उपचार घेत असून, तिला रेल्वेने एका पैशाचीही मदत केलेली नाही. तिच्या उपचारावर वैद्य यांनी आतापर्यंत ४२ लाख रुपये खर्च केले.

वैद्य यांनी सांगितले की,  ते एका खासगी कंपनीत काम करीत होते. आता ते सेवानिवृत्त आहेत. ते यापूर्वी विक्रोळीत राहत होते. दोन मुली, मुलगा आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे. सध्या ते डोंबिवलीतील गरिबाचा वाडा रोड येथील वसंत हेरिटेज या इमारतीत राहतात. त्यांची मुलगी तेजश्री हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती साठे कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला असताना ती १९ एप्रिल २०१८ रोजी सकाळी परीक्षेसाठी मुंबईला फास्ट ट्रेनने निघाली होती. सायन स्थानकादरम्यान तेजश्री गाडीतून पडली. दोन तास ती रेल्वेच्या नाल्यात पडून होती. तीन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती काेमात होती. काेमातून बाहेर आली असली तरी ती नीट बोलू शकत नाही. तेव्हापासून तिच्या उपचारावर ४२ लाख रुपये खर्च झाले आहेत.

रेल्वेची असंवेदनशील प्रश्नांची सरबत्ती

मुलीचा अपघात झाला याची रेल्वेने साधी विचारपूसही केली नाही. उपचारासाठी खर्च दिला नाही. रेल्वेकडे आर्थिक भरपाई मागितली तेव्हा रेल्वेने आमची उलट तपासणी घेतली. गर्दीतून प्रवास करण्याची गरज काय होती? ती दारात कशाला उभी होती? तुमच्या मुलीचे घरात भांडण झाले होते का?  तुमच्या मुलीचे बाहेर काही प्रेमप्रकरण होते का? या वादातून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का? अशा  नको-नको त्या असंवेदशील प्रश्नांची सरबत्ती करून आम्हाला गप्प केले. अखेरीस वैद्य यांनी अपघाताची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी मुंबई रेल्वे अपघात न्याय प्राधिकरणाकडे  दावा दाखल केला. आठ लाखांची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.