शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

By मुरलीधर भवार | Updated: June 10, 2025 06:10 IST

रेल्वे अपघातात मृत्युमुखी अथवा जखमी झालेल्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला काडीमात्रही सहानुभूती नाही, अशा शब्दांत श्रीराम वैद्य यांनी संताप व्यक्त केला.

मुरलीधर भवार

डोंबिवली : रेल्वे अपघातात मृत्युमुखी अथवा जखमी झालेल्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला काडीमात्रही सहानुभूती नाही, अशा शब्दांत श्रीराम वैद्य यांनी संताप व्यक्त केला. रेल्वेच्या संवेदनशून्य कारभाराचा अनुभव वैद्य गेली सात वर्षे घेत आहेत. त्यांची मुलगी तेजश्री हिचा धावत्या गाडीतून पडून अपघात झाला. त्यात ती गंभीर जखमी झाली. सात वर्षांपासून ती उपचार घेत असून, तिला रेल्वेने एका पैशाचीही मदत केलेली नाही. तिच्या उपचारावर वैद्य यांनी आतापर्यंत ४२ लाख रुपये खर्च केले.

वैद्य यांनी सांगितले की,  ते एका खासगी कंपनीत काम करीत होते. आता ते सेवानिवृत्त आहेत. ते यापूर्वी विक्रोळीत राहत होते. दोन मुली, मुलगा आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे. सध्या ते डोंबिवलीतील गरिबाचा वाडा रोड येथील वसंत हेरिटेज या इमारतीत राहतात. त्यांची मुलगी तेजश्री हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती साठे कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला असताना ती १९ एप्रिल २०१८ रोजी सकाळी परीक्षेसाठी मुंबईला फास्ट ट्रेनने निघाली होती. सायन स्थानकादरम्यान तेजश्री गाडीतून पडली. दोन तास ती रेल्वेच्या नाल्यात पडून होती. तीन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती काेमात होती. काेमातून बाहेर आली असली तरी ती नीट बोलू शकत नाही. तेव्हापासून तिच्या उपचारावर ४२ लाख रुपये खर्च झाले आहेत.

रेल्वेची असंवेदनशील प्रश्नांची सरबत्ती

मुलीचा अपघात झाला याची रेल्वेने साधी विचारपूसही केली नाही. उपचारासाठी खर्च दिला नाही. रेल्वेकडे आर्थिक भरपाई मागितली तेव्हा रेल्वेने आमची उलट तपासणी घेतली. गर्दीतून प्रवास करण्याची गरज काय होती? ती दारात कशाला उभी होती? तुमच्या मुलीचे घरात भांडण झाले होते का?  तुमच्या मुलीचे बाहेर काही प्रेमप्रकरण होते का? या वादातून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का? अशा  नको-नको त्या असंवेदशील प्रश्नांची सरबत्ती करून आम्हाला गप्प केले. अखेरीस वैद्य यांनी अपघाताची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी मुंबई रेल्वे अपघात न्याय प्राधिकरणाकडे  दावा दाखल केला. आठ लाखांची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.