शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांकडून केलेल्या फसवणुकीचा तपास एसआयटीकडे; केडीएमसी आणि रेराची फसवणूक

By मुरलीधर भवार | Updated: October 6, 2022 17:49 IST

फसवणूक करणारे कल्याण डोंबिवलीतील ६५ बिल्डरांच्या विरोधात मानपाडा आणि डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कल्याण - खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रकल्पाचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणातील फसवणूक करणारे कल्याण डोंबिवलीतील ६५ बिल्डरांच्या विरोधात मानपाडा आणि डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आत्ता एसआयटीकडे देण्यात आला आहे.

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि वासूतविशारद संदीप पाटील यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड आणली. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली. याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेस फटकारले. कारण महापालिका आणि रेरा प्राधिकरण या दोघांची फसवणूक करुन नागरीकांचीही देखील फसवणूक केली जात होती. महापालिका अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कल्याण ग्रामीणमधील २७ बिल्डरांच्या विरोधात तक्रार दिली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सर्व प्रथम गुन्हा दाखल केला. त्या पाठोपाठ डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यातही ३८ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गेल्या आठवडा भरात हे प्रकरण चांगलेच तापले असताना रेरा प्राधिकरणाने ६५ बिल्डरांना दिलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यांनी केडीएमसीची खोटी परवानगी भासवून रेरा मिळविले आहे. ही बाब समोर आल्याने रेराने ही कारवाई केली. दरम्यान ठाणो पोलिस आयुक्तांनी मानपाडा पोलिसांकडे विचारणा केली की, गुन्हा दाखल होऊन एक आठवडा झाला. तपासात काय प्रगती आहे. त्यावर तपास अधिका:यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपासकरीता स्पेशल इनव्हेस्टींग टीम तयार करुन याचा तपास ठाणो गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्तांकडे सूपूर्द केला आहे. हा तपास गुन्हे अन्वेशषण शाखेला दिल्याने तपासाला गती मिळणार आहे.

दरम्यान काही वर्षापूर्वी कल्याणचे तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय जाधव कार्यरत असताना कल्याण टिटवाळा, आंबिवली, नांदिवली, कल्याण मलंग रोड आदी परिसरात चाळ माफियांनी नागरीकांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून पैसे उकळले होते. इतकेच नाही तर बेकायदा चाळी बांधणाऱ्या चाळ माफियांनी नेवाळी नजीक असलेल्या नौदलाच्या जागेवर बेकायदा चाळी उभारल्या होत्या. या प्रकरणी उपायुक्तांनी त्यावेळी एसआयटी नेमली होती. जवळपास २५ कोटी पेक्षा जास्त फसवणूकीचा आकडा होता. त्या एसआयटीच्या तपासाचे पुढे काय झाले. त्यातून काय निष्पन्न झाले हे पोलिस प्रशासनाकडून अद्याप उघड करण्यात आलेले नाही. यात भरडला गेला तो सामान्य माणूस आणि त्याचीच खरी फसवणूक झाली. पैसा लाटणारे मोकट सुटले. 

टॅग्स :kalyanकल्याण