शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

बिल्डरांकडून केलेल्या फसवणुकीचा तपास एसआयटीकडे; केडीएमसी आणि रेराची फसवणूक

By मुरलीधर भवार | Updated: October 6, 2022 17:49 IST

फसवणूक करणारे कल्याण डोंबिवलीतील ६५ बिल्डरांच्या विरोधात मानपाडा आणि डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कल्याण - खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रकल्पाचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणातील फसवणूक करणारे कल्याण डोंबिवलीतील ६५ बिल्डरांच्या विरोधात मानपाडा आणि डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आत्ता एसआयटीकडे देण्यात आला आहे.

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि वासूतविशारद संदीप पाटील यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड आणली. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली. याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेस फटकारले. कारण महापालिका आणि रेरा प्राधिकरण या दोघांची फसवणूक करुन नागरीकांचीही देखील फसवणूक केली जात होती. महापालिका अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कल्याण ग्रामीणमधील २७ बिल्डरांच्या विरोधात तक्रार दिली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सर्व प्रथम गुन्हा दाखल केला. त्या पाठोपाठ डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यातही ३८ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गेल्या आठवडा भरात हे प्रकरण चांगलेच तापले असताना रेरा प्राधिकरणाने ६५ बिल्डरांना दिलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यांनी केडीएमसीची खोटी परवानगी भासवून रेरा मिळविले आहे. ही बाब समोर आल्याने रेराने ही कारवाई केली. दरम्यान ठाणो पोलिस आयुक्तांनी मानपाडा पोलिसांकडे विचारणा केली की, गुन्हा दाखल होऊन एक आठवडा झाला. तपासात काय प्रगती आहे. त्यावर तपास अधिका:यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपासकरीता स्पेशल इनव्हेस्टींग टीम तयार करुन याचा तपास ठाणो गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्तांकडे सूपूर्द केला आहे. हा तपास गुन्हे अन्वेशषण शाखेला दिल्याने तपासाला गती मिळणार आहे.

दरम्यान काही वर्षापूर्वी कल्याणचे तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय जाधव कार्यरत असताना कल्याण टिटवाळा, आंबिवली, नांदिवली, कल्याण मलंग रोड आदी परिसरात चाळ माफियांनी नागरीकांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून पैसे उकळले होते. इतकेच नाही तर बेकायदा चाळी बांधणाऱ्या चाळ माफियांनी नेवाळी नजीक असलेल्या नौदलाच्या जागेवर बेकायदा चाळी उभारल्या होत्या. या प्रकरणी उपायुक्तांनी त्यावेळी एसआयटी नेमली होती. जवळपास २५ कोटी पेक्षा जास्त फसवणूकीचा आकडा होता. त्या एसआयटीच्या तपासाचे पुढे काय झाले. त्यातून काय निष्पन्न झाले हे पोलिस प्रशासनाकडून अद्याप उघड करण्यात आलेले नाही. यात भरडला गेला तो सामान्य माणूस आणि त्याचीच खरी फसवणूक झाली. पैसा लाटणारे मोकट सुटले. 

टॅग्स :kalyanकल्याण