शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

...त्यावेळी शिवसेना एकच होती, कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी; आमदार राजू पाटील यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 2, 2023 14:54 IST

मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

कल्याण : मुंबईत कोविड घोटाळा झाला आहेच, त्याबरोबर ठाणे, कल्याणडोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळा झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. त्यावेळी शिवसेना एकच होती. बीएमसी प्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी असे ट्विट करत आमदार पाटील यांनी मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर ,अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत आमदार पाटील यांनी ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेत कोविड घोटाळा झालाच आहे पण त्याच बरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिकांमध्ये पण प्रचंड प्रमाणात कोविड घोटाळा झाला आहे. आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी 'त्यावेळी एकच शिवसेना होती.यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. कारण या सर्व पालिकांमध्ये यांचीच सत्ता किंवा प्रशासक होते.

दरम्यान गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावरून मनसे पाटील यांनी गेली २५ ते ३० वर्ष महापालिका शिवसेनेच्या ताब्यात . ठाकरे गटाचा मोर्चा एक फार्स आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू अशी टीका करत ठाकरे गटासह शिंदे सरकारला देखील लक्ष केले आहे.

या मोर्चा बाबत पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी असे मोर्चे निघाले पाहिजेत, त्यांनी इथे देखील एखादा मोर्चा काढावा. अशी कोणती महापालिका आहे, जिथे घोटाळे झालेले नाहीत. या महापालिका कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहेत. गेली ३० वर्ष या महापालिका शिवसेनेचा ताब्यात आहेत आता शिवसेनेत दोन गट झालेत. पूर्वी काय होते या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्यामुळे मोर्चा काढला हा फार्स आहे. याची सरकारने निष्पक्ष चौकशी करावी मात्र सरकारकडून तीही अपेक्षा नाही असा टोला आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटासह शिंदे सरकारला लगावला आहे. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याणdombivaliडोंबिवली