शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

...त्यावेळी शिवसेना एकच होती, कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी; आमदार राजू पाटील यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 2, 2023 14:54 IST

मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

कल्याण : मुंबईत कोविड घोटाळा झाला आहेच, त्याबरोबर ठाणे, कल्याणडोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळा झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. त्यावेळी शिवसेना एकच होती. बीएमसी प्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी असे ट्विट करत आमदार पाटील यांनी मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर ,अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत आमदार पाटील यांनी ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेत कोविड घोटाळा झालाच आहे पण त्याच बरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिकांमध्ये पण प्रचंड प्रमाणात कोविड घोटाळा झाला आहे. आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी 'त्यावेळी एकच शिवसेना होती.यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. कारण या सर्व पालिकांमध्ये यांचीच सत्ता किंवा प्रशासक होते.

दरम्यान गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावरून मनसे पाटील यांनी गेली २५ ते ३० वर्ष महापालिका शिवसेनेच्या ताब्यात . ठाकरे गटाचा मोर्चा एक फार्स आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू अशी टीका करत ठाकरे गटासह शिंदे सरकारला देखील लक्ष केले आहे.

या मोर्चा बाबत पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी असे मोर्चे निघाले पाहिजेत, त्यांनी इथे देखील एखादा मोर्चा काढावा. अशी कोणती महापालिका आहे, जिथे घोटाळे झालेले नाहीत. या महापालिका कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहेत. गेली ३० वर्ष या महापालिका शिवसेनेचा ताब्यात आहेत आता शिवसेनेत दोन गट झालेत. पूर्वी काय होते या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्यामुळे मोर्चा काढला हा फार्स आहे. याची सरकारने निष्पक्ष चौकशी करावी मात्र सरकारकडून तीही अपेक्षा नाही असा टोला आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटासह शिंदे सरकारला लगावला आहे. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याणdombivaliडोंबिवली