शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ राजीनामा

By मुरलीधर भवार | Updated: October 18, 2023 18:04 IST

शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा, थरवळ म्हणाले मी कुठेही जाणार नाही...

मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण-शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. थरवळ यांनी पक्षाला अपेक्षित असलेले काम त्यांच्याकडून होत नसल्याने राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे तरी ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.  मी कुठेही जाणार नसल्याचे थरवळ यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने ठाकरे गटाकडून पक्ष बांधणी करीत अनेकांवर जबाबदारी दिली जात आहे. दुसरीकडे थरवळ यांनी दिलेला राजीनामा दिल्याने तर्कविर्तक व्यक्त केले जात आहेत.

थरवळ हे शिवसेनेत १९८० सालाापासून कार्यरत आहे. शिवसैनिक ते कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत ते नगरसेवक होते. शिवसेनेत फूट पडल्यावर ठाकरे आणि शिंदे गट तयार झाले. थरवळ यांनी ठाकरे गटात राहणे पसंत केले. ठाकरे गटाने त्यांच्यावर कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी २७ जुलै २०२२ साली दिली गेली होती. वर्षभर ही जबाबदारी त्यांनी संभाळली. पक्ष संघटना वाढीस लावण्याचे प्रयत्न केले. मात्र आत्ता पक्षाला अपेक्षित असलेले काम त्यांच्याकडून होत नसल्याचे कारण देत त्यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मी शिवसैनिक होतो. शिवसैनिकच राहणार. शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करणार. मात्र मी शिंदे गटात जाणार राजकीय चर्चेला काही अर्थ नाही. मी कुठेही जाणार नाही.

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर थरवळ यांनी राजीनामा दिल्याने पक्ष प्रमुख ठाकरे हे त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पक्षाने त्यांचा राजीनामा स्विकारला नाही तर थरवळ काय करणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. थरवळ यांच्या राजीनाम्याविषयी ठाकर गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्या राजीनाम्या विषयी मला काही एक कल्पना नाही.

एकीकडे कल्याण लोकसभेची जागा ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. ती त्यांना जिंकायची आहे असे आवाहनही पक्षाचे प्रमुख ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत बोलून दाखविली होती. त्याच कल्याण लोकसभेकरीता नेमलेले जिल्हाध्यक्ष राजीनामा देणार असतील तर पक्षाची पूढील भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना