शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून स्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल

By मुरलीधर भवार | Updated: September 15, 2023 18:59 IST

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून गणेशोत्सवा आधी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दररोज नवी डेडलाईन दिली जाते.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून गणेशोत्सवा आधी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दररोज नवी डेडलाईन दिली जाते. इतकेच नाही तर निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी ठेकेदारांच्या विरोधात कारवाई करण्याचाइशारा दिला जातो. मात्र टिटवाळ्यात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम कसे निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. याची पोलखोल केली जात आहे. त्यानंतर या प्रकरणात आयुक्त काय कारवाई करतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.. गेल्या महिनाभरापासून हे खड्डे भरण्याचे मागणी नागरिक करीत आहेत..प्रशासनाकडून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.. गणेशोत्सव काही दिवसांनी येऊन ठेपलाय मात्र अद्यापही रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे पूर्ण झालेली नाहीत. ही कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे..कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात असल्याचे देखील सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवरील कामाची विदारक परिस्थिती समोर येते आहे. टिटवाळा परिसरात आज सकाळपासून रस्त्यांवरील खड्डे डांबराने भरण्याचे काम सुरू होते.सकाळच्या सुमारास पाऊस सुरू झाला.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विजय देशेकर यांनी संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांना पाऊस सुरू झाला आहे. रस्त्यावर पाणी आहे. त्यात डांबर टाकू नका अशी सूचना केली.

मात्र त्यानंतर ही या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. भर पावसात रस्त्यावर पाणी साचलेले असताना देखील त्यावर डांबरीकरण सुरू होते. विजय दशेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणला आहे. महापालिका आयुक्तांनी नित्कृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व जबाबदार असलेला अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितलं होते. हा प्रकार आता समोर आलाय त्यामुळे महापालिका आयुक्त आता कारवाई करणार का? असा सवाल संतप्त देशेकर यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना