शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी कामगार संघर्ष समितीच्या धरणो आंदोलनास शिवसेनासह मनसे, राष्ट्रवादीचाही पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:13 IST

आंबिवली, मोहने, आटाळी, गाळेगाव बंद

कल्याण- आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी न देता अदानी ग्रुप कंपनीने कंपनीच्या कामगारांच्या घरांवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. या एकतर्फी कारवाई विरोधात आणि थकीत देणी मिळावी या मागणीसाठी एनआरसी कामगार संघर्ष समितीने कंपनी समोरच बेमुदत धरणे आंदोलन पाच दिवसापासून सुरु केले आहे. या आंदोलास पाठिंबा देण्यासाठी आंबिवली, मोहने,आटाळी आणि गाळेगाव परिसरातील व्यापा:यांनी आज बंद पाळला. या आंदोलनास शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

शिवसेना आमदार भोईर यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून एनआरसीचे कामगार त्यांच्या न्याय हक्काच्या थकीत देण्यासाठी संघर्ष करीत आहे. हे कामगार आत्ता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी भोईर यांनी केली आहे. या आंदोलनास त्यांनी शिवसेनेच्या वतीने जाहिर पाठिंबा दिला आहे.

कामगारांच्या धरणो आंदोलनास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला होता. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा पाठिंबा आंदोलनास मिळत असल्याने कामगारांच्या आशा आत्ता पल्लवीत झालेल्या आहे. त्यात आज आंबिवली, मोहने, आटाळी आणि गाळेगाव या चारही गावांनी बंद पाळून दिलेला पाठिंबा हा कामगारांना दिलासा देणारा आहे.

कंपनी २००९ सालापासून बंद आहे. जवळपास साडे चार हजार कामगारांची थकीत देणीत अद्याप दिलेली नाही. थकीत देण्याचा विषय नॅशनल कंपनी लॉ ट्रब्यूनल दिल्लीकडे न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान कंपनीने अदानी ग्रुपला जागा दिलेली आहे. या कंपनीकडून कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरु आहे. त्याला कामगारांनी वारंवार विरोध केला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. त्यानंतर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन देणी दिली जात नाही. तोर्पयत पाडकाम स्थगीत करण्याचे सांगितले होते. त्यानंतरही पाडकाम सुरु असल्याने अखेरीस कामगारांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान काल कामगार आयुक्त चंद्रकांत कल्याणकर यांच्याकडे एनआरसी कामगार संघर्ष समितीने त्यांचे काय म्हणणे आहे याचे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाचा विचार करुन सविस्तर अहवाल तयार करुन तो कामगार मंत्र्यांना सादर केला जाईल असे आश्वासन कामगार आयुक्त कल्याणकर यांनी कामगार संघर्ष समितीला दिले असल्याची माहिती भीमराव डोळस आणि रामदास पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMNSमनसेShiv Senaशिवसेना