शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

By मुरलीधर भवार | Updated: January 10, 2023 18:13 IST

उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे.

कल्याण-उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर फेसाचा तवंग साचला आहे. याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीने लक्ष वेधले आहे. 

म्हारळमधून वाहत येणारा नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी पात्रत सोडले जात आहे. हा नाला नदी पात्रत मिळसतो. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीचे प्रदूषित पाणी ज्याठिकाणी पाणी पंपिंग केले जाते. त्याठिकाणी जाऊन मिसळते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीचे प्रमुख रविंद्र लिंगायत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी या प्रदूषणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रदूषणाचा व्हीडीओच त्यांनी सोशल मिडियावर टाकला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरीकांना त्वचारोग आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर नदीतील मासे आणि जैवविविधता धोक्यात आली आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी समितीच्या वतीने विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र सरकारी यंत्रणा गाढ झोपेत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी अनेकवेळा नदी पात्रत उपोषण केले आहे. त्यानंतर नदी पात्रतील जलपर्णी दूर करण्यासाठी हर्बल फवारणी केली गेली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २४ लाख रुपये खर्च केले गेले. त्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. नदी मिसळणारे नाले वळविण्याकरीता महापालिकेने मास्टर प्लान तयार केला होता. मे २०२२ पर्यंत नदीचे प्रदूषण रोखले जाईल असा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेने केला होता. तो दावा फोल ठरला असल्याचे लिंगायत यांनी सांगितले.

इतकेच नाही तर प्रदूषणावर गॅबीयन बंधा:याचा उतारा महापालिकेने शोधला होता. बंधाराही बांधला. मात्र म्हारळमधून वाहणारे नाल्याचे सांडपाणी रोखले गेले नसल्याचे तसेच नाला वळविला आहे तर तो नेमका कुठे वळविला आहे. मग पाणी थेट नदी पात्रत कसे मिसळत आहे. असे अनेक प्रश्न लिंगायत यांनी उपस्थित केलेआहेत.

टॅग्स :kalyanकल्याण