शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

By मुरलीधर भवार | Updated: January 10, 2023 18:13 IST

उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे.

कल्याण-उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर फेसाचा तवंग साचला आहे. याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीने लक्ष वेधले आहे. 

म्हारळमधून वाहत येणारा नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी पात्रत सोडले जात आहे. हा नाला नदी पात्रत मिळसतो. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीचे प्रदूषित पाणी ज्याठिकाणी पाणी पंपिंग केले जाते. त्याठिकाणी जाऊन मिसळते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीचे प्रमुख रविंद्र लिंगायत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी या प्रदूषणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रदूषणाचा व्हीडीओच त्यांनी सोशल मिडियावर टाकला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरीकांना त्वचारोग आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर नदीतील मासे आणि जैवविविधता धोक्यात आली आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी समितीच्या वतीने विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र सरकारी यंत्रणा गाढ झोपेत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी अनेकवेळा नदी पात्रत उपोषण केले आहे. त्यानंतर नदी पात्रतील जलपर्णी दूर करण्यासाठी हर्बल फवारणी केली गेली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २४ लाख रुपये खर्च केले गेले. त्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. नदी मिसळणारे नाले वळविण्याकरीता महापालिकेने मास्टर प्लान तयार केला होता. मे २०२२ पर्यंत नदीचे प्रदूषण रोखले जाईल असा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेने केला होता. तो दावा फोल ठरला असल्याचे लिंगायत यांनी सांगितले.

इतकेच नाही तर प्रदूषणावर गॅबीयन बंधा:याचा उतारा महापालिकेने शोधला होता. बंधाराही बांधला. मात्र म्हारळमधून वाहणारे नाल्याचे सांडपाणी रोखले गेले नसल्याचे तसेच नाला वळविला आहे तर तो नेमका कुठे वळविला आहे. मग पाणी थेट नदी पात्रत कसे मिसळत आहे. असे अनेक प्रश्न लिंगायत यांनी उपस्थित केलेआहेत.

टॅग्स :kalyanकल्याण