शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

By मुरलीधर भवार | Updated: January 10, 2023 18:13 IST

उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे.

कल्याण-उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर फेसाचा तवंग साचला आहे. याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीने लक्ष वेधले आहे. 

म्हारळमधून वाहत येणारा नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी पात्रत सोडले जात आहे. हा नाला नदी पात्रत मिळसतो. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीचे प्रदूषित पाणी ज्याठिकाणी पाणी पंपिंग केले जाते. त्याठिकाणी जाऊन मिसळते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीचे प्रमुख रविंद्र लिंगायत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी या प्रदूषणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रदूषणाचा व्हीडीओच त्यांनी सोशल मिडियावर टाकला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरीकांना त्वचारोग आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर नदीतील मासे आणि जैवविविधता धोक्यात आली आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी समितीच्या वतीने विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र सरकारी यंत्रणा गाढ झोपेत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी अनेकवेळा नदी पात्रत उपोषण केले आहे. त्यानंतर नदी पात्रतील जलपर्णी दूर करण्यासाठी हर्बल फवारणी केली गेली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २४ लाख रुपये खर्च केले गेले. त्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. नदी मिसळणारे नाले वळविण्याकरीता महापालिकेने मास्टर प्लान तयार केला होता. मे २०२२ पर्यंत नदीचे प्रदूषण रोखले जाईल असा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेने केला होता. तो दावा फोल ठरला असल्याचे लिंगायत यांनी सांगितले.

इतकेच नाही तर प्रदूषणावर गॅबीयन बंधा:याचा उतारा महापालिकेने शोधला होता. बंधाराही बांधला. मात्र म्हारळमधून वाहणारे नाल्याचे सांडपाणी रोखले गेले नसल्याचे तसेच नाला वळविला आहे तर तो नेमका कुठे वळविला आहे. मग पाणी थेट नदी पात्रत कसे मिसळत आहे. असे अनेक प्रश्न लिंगायत यांनी उपस्थित केलेआहेत.

टॅग्स :kalyanकल्याण