शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

लोकांना फसविणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त करा

By मुरलीधर भवार | Updated: December 16, 2024 09:37 IST

कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांचे एकत्रीकरण करून १९८३ साली  महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत या महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न कायम आहे.

मुरलीधर भवार, प्रतिनिधी

कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांचे एकत्रीकरण करून १९८३ साली  महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत या महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न कायम आहे. त्यावर आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी कोणताही ठोस तोडगा काढला नाही. ही बेकायदा बांधकामे जमीनदोस्तही केली नाहीत. फक्त यातून सामान्य नागरिकांची फसवणूक झाली. उच्च न्यायालयाने बेकायदा प्रकरणात वेळोवेळी कारवाईचे आदेश दिले. मात्र, ज्या बिल्डरांनी ही बेकायदा बांधकामे केली. त्यांच्या मालमत्ता जप्त करून फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाकडून दिला जाणे आवश्यक आहे. 

महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामप्रकरणी २००४ साली कौस्तुभ गोखले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने अग्यार समिती नेमली. या अग्यार समितीने १९८३ ते २००९ या कालावधी झालेल्या बेकायदा बांधकामांचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार २००९ सालापर्यंत ६७ हजार ९०० बेकायदा बांधकामे झाल्याचे उघड झाले. यात तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, आयुक्त, प्रभाग अधिकारी, लोकप्रतिनिधी या सगळ्यांना जबाबदार धरले होते. हा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला. त्यावर कार्यवाही करण्याचा आदेशही दिला. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी त्यांच्याच दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली किंवा कसे, याची झाडाझडती घेतली, तर दोषींवर कारवाई होऊ शकते. ज्यांनी कारवाईत दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे. 

पालिका मुख्यालयही बेकायदा

गोखले यांच्या याचिकेवर अंतिम निकाल आला, तर कल्याण न्यायालय, महापालिका मुख्यालय, महापौर निवास, आयुक्तांचे निवास हेही बेकायदेशीर असून, त्यावरही कारवाई करावी लागेल. वास्तुविशारद संदीप पाटील यांनी ‘रेरा’ प्राधिकरणासह राज्य सरकार आणि महापालिकेची फसवणूक करून महापालिका हद्दीत ६५ बेकायदा इमारतीचे प्रकरण उघडकीस आणले. चौकशीची मागणी करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ६५ बेकायदा इमारती तोडण्याचा आदेश दिला. या इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. त्यात राहणा-या नागरिकांचे भवितव्य अधांतरी आहे. 

चौकशीदरम्यान ५६ जणांची बँक खाती गोठविण्यात आली. १० जणांना अटक करण्यात आली. बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्यापैकी एकाही बिल्डरला अटक केलेली नाही. संबंधित बिल्डरांनी अटकपूर्व जामीन मिळविला आहे. 

बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर आणि त्यांना साथ देणारे महापालिकेतील अधिकारी मोकाट आहेत. बेकायदा बांधकामप्रकरणी एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेले नाही. त्यांच्याविरोधात चाैकशी लावलेली नाही. त्यामुळे बेकायदा बांधकाम केले, तर कारवाई शून्य होते. कायद्याचे भय त्यांना नाही. त्यात सामान्य नागरिक भरडला जातो. तो कर्ज काढून घर घेतो. त्याची लाखो रुपयांची फसवणूक होते, अशा सर्वसामान्यांची भरपाई कोण करून देणार?

२००९ नंतर आतापर्यंत १ लाख ७० हजार बेकायदा बांधकामे झाली, याचे पुरावे गोखले यांनी सादर केले. अशा बांधकामांवर महापालिका ‘बेकायदा बांधकामांच्या कारवाईस अधीन राहून’, असे शिक्के मारून मालमत्ता कराची वसुली करते. 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका