शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

मराठी साहित्याची समीक्षा खुजी; ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 08:51 IST

डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : साहित्याची समीक्षा करण्यासाठी मराठी वाङ्मय अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडे वाङ्मय अभ्यास कोणी करीत नाही. त्यामुळे मराठी विकसित झालेली नाही. परिणामी मराठी साहित्याची समीक्षा खुजी आणि दुबळी आहे, अशी खंत मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी रविवारी येथे व्यक्त केली.डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. डॉ. रसाळ यांनी सांगितले की, समीक्षा या प्रकाराकडे लक्ष दिले जात नाही. साहित्याच्या झाडावर बांडगूळ उगवते त्या दृष्टीने समीक्षकाकडे लेखक पाहतात. मराठी साहित्य वाचले जात नसल्याने साहित्याची समीक्षा कोण वाचणार, असा प्रश्न आहे. मराठी साहित्यात समीक्षकांची वानवा आहे. मराठी साहित्याची समीक्षा ही पाश्चात्यांच्या समीक्षेवर अवलंबून राहिली आहे. आपल्या समीक्षकांनी परंपरेशी जोडून घेऊन ती केलेली नाही. मध्ययुगीन समीक्षक नवे लिहणाऱ्याचे काही वाचत नाहीत. नवे लिहिणारे मध्ययुगीन साहित्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या साहित्याची समीक्षा योग्य प्रकारे झालेली नाही. आपल्याकडे दीडशे वर्षांच्या कार्यकाळात मराठीतील एकही ग्रंथ अन्य भाषेत भाषांतरित झालेला नाही, याकडे लक्ष वेधले.

‘आपला समाज आधुनिक कधी होणार’?nनंदी दूध पितो अशी बातमी आज वर्तमानपत्रांतून वाचली. अशा प्रकारची बातमी देणे हेच मुळात चुकीचे आहे. nनंदी दूध पितो यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. एकवेळ परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या पातळीवर श्रद्धा असणे हे असू शकते. समीक्षक म्हणून माझी स्वतंत्र भूमिका असू शकत नाही. nएक विचार करणारा नागरिक म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे या सगळ्यांमधून आपला समाज अजून किती बदलण्याची गरज आहे हे कळते. nआपल्या समाजाचे आधुनिकीकरण कधी होणार असा सवाल ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी विचारला. जेव्हा विचारवंताचा मोठा वर्ग सतत अनेक सामाजिक प्रश्नांवर विचार मांडत राहील तेव्हा या गोष्टी दूर होतील.