शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्याची समीक्षा खुजी; ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 08:51 IST

डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : साहित्याची समीक्षा करण्यासाठी मराठी वाङ्मय अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडे वाङ्मय अभ्यास कोणी करीत नाही. त्यामुळे मराठी विकसित झालेली नाही. परिणामी मराठी साहित्याची समीक्षा खुजी आणि दुबळी आहे, अशी खंत मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी रविवारी येथे व्यक्त केली.डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. डॉ. रसाळ यांनी सांगितले की, समीक्षा या प्रकाराकडे लक्ष दिले जात नाही. साहित्याच्या झाडावर बांडगूळ उगवते त्या दृष्टीने समीक्षकाकडे लेखक पाहतात. मराठी साहित्य वाचले जात नसल्याने साहित्याची समीक्षा कोण वाचणार, असा प्रश्न आहे. मराठी साहित्यात समीक्षकांची वानवा आहे. मराठी साहित्याची समीक्षा ही पाश्चात्यांच्या समीक्षेवर अवलंबून राहिली आहे. आपल्या समीक्षकांनी परंपरेशी जोडून घेऊन ती केलेली नाही. मध्ययुगीन समीक्षक नवे लिहणाऱ्याचे काही वाचत नाहीत. नवे लिहिणारे मध्ययुगीन साहित्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या साहित्याची समीक्षा योग्य प्रकारे झालेली नाही. आपल्याकडे दीडशे वर्षांच्या कार्यकाळात मराठीतील एकही ग्रंथ अन्य भाषेत भाषांतरित झालेला नाही, याकडे लक्ष वेधले.

‘आपला समाज आधुनिक कधी होणार’?nनंदी दूध पितो अशी बातमी आज वर्तमानपत्रांतून वाचली. अशा प्रकारची बातमी देणे हेच मुळात चुकीचे आहे. nनंदी दूध पितो यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. एकवेळ परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या पातळीवर श्रद्धा असणे हे असू शकते. समीक्षक म्हणून माझी स्वतंत्र भूमिका असू शकत नाही. nएक विचार करणारा नागरिक म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे या सगळ्यांमधून आपला समाज अजून किती बदलण्याची गरज आहे हे कळते. nआपल्या समाजाचे आधुनिकीकरण कधी होणार असा सवाल ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी विचारला. जेव्हा विचारवंताचा मोठा वर्ग सतत अनेक सामाजिक प्रश्नांवर विचार मांडत राहील तेव्हा या गोष्टी दूर होतील.