शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

मराठी साहित्याची समीक्षा खुजी; ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 08:51 IST

डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : साहित्याची समीक्षा करण्यासाठी मराठी वाङ्मय अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडे वाङ्मय अभ्यास कोणी करीत नाही. त्यामुळे मराठी विकसित झालेली नाही. परिणामी मराठी साहित्याची समीक्षा खुजी आणि दुबळी आहे, अशी खंत मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी रविवारी येथे व्यक्त केली.डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. डॉ. रसाळ यांनी सांगितले की, समीक्षा या प्रकाराकडे लक्ष दिले जात नाही. साहित्याच्या झाडावर बांडगूळ उगवते त्या दृष्टीने समीक्षकाकडे लेखक पाहतात. मराठी साहित्य वाचले जात नसल्याने साहित्याची समीक्षा कोण वाचणार, असा प्रश्न आहे. मराठी साहित्यात समीक्षकांची वानवा आहे. मराठी साहित्याची समीक्षा ही पाश्चात्यांच्या समीक्षेवर अवलंबून राहिली आहे. आपल्या समीक्षकांनी परंपरेशी जोडून घेऊन ती केलेली नाही. मध्ययुगीन समीक्षक नवे लिहणाऱ्याचे काही वाचत नाहीत. नवे लिहिणारे मध्ययुगीन साहित्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या साहित्याची समीक्षा योग्य प्रकारे झालेली नाही. आपल्याकडे दीडशे वर्षांच्या कार्यकाळात मराठीतील एकही ग्रंथ अन्य भाषेत भाषांतरित झालेला नाही, याकडे लक्ष वेधले.

‘आपला समाज आधुनिक कधी होणार’?nनंदी दूध पितो अशी बातमी आज वर्तमानपत्रांतून वाचली. अशा प्रकारची बातमी देणे हेच मुळात चुकीचे आहे. nनंदी दूध पितो यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. एकवेळ परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या पातळीवर श्रद्धा असणे हे असू शकते. समीक्षक म्हणून माझी स्वतंत्र भूमिका असू शकत नाही. nएक विचार करणारा नागरिक म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे या सगळ्यांमधून आपला समाज अजून किती बदलण्याची गरज आहे हे कळते. nआपल्या समाजाचे आधुनिकीकरण कधी होणार असा सवाल ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी विचारला. जेव्हा विचारवंताचा मोठा वर्ग सतत अनेक सामाजिक प्रश्नांवर विचार मांडत राहील तेव्हा या गोष्टी दूर होतील.