शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा!

By नितीन पंडित | Updated: August 22, 2022 15:25 IST

या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली. 

- नितीन पंडित

भिवंडी : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या छैलसिंह नावाच्या मुख्याध्यापकाने इंद्र देवाराम मेघवाल या ८ वर्षाच्या निरागस दलित विद्यार्थ्याने तहान लागली म्हणून मुख्यध्यापक छैलसिंहच्या मटक्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून छैलसिंहने आठ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेलार मिठपाडा ते भिवंडी तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चा प्रसंगी सेक्युलरचे कार्यकर्ते आकाश साळुंखे, प्रदीप गायकवाड,अजिंक्य गायकवाड,दिनेश जाधव,अमोल तपासे,रवी सोनावणे यांच्यासह महिला व नागरिकांसह शाळेचे विद्यार्थी व वकील देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयासमोर पोलोसांनी या मोर्चास अडवल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

यावेळी मयत विद्यार्थी इंद्र मेघवाल हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. त्यांनतर सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्यासह शिष्ठमंडळाने भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. हे निवेदन शालेय विद्यार्थींनी तहसीदारांकडे सोपविले व या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली. 

दरम्यान, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात पाण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण व हत्या होते, ही घटना देशासाठी निंदनीय असून या घटनेस जबाबदार असलेल्या आरोपीस कठोर शासन करावे तसेच अशा प्रकारच्या देशातील घटनांना रोखण्यासाठी केंद्र शासनाने विशेषउपाय योजना करावी अन्यथा आरपीआय सेक्युलरच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी