शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा!

By नितीन पंडित | Updated: August 22, 2022 15:25 IST

या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली. 

- नितीन पंडित

भिवंडी : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या छैलसिंह नावाच्या मुख्याध्यापकाने इंद्र देवाराम मेघवाल या ८ वर्षाच्या निरागस दलित विद्यार्थ्याने तहान लागली म्हणून मुख्यध्यापक छैलसिंहच्या मटक्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून छैलसिंहने आठ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेलार मिठपाडा ते भिवंडी तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चा प्रसंगी सेक्युलरचे कार्यकर्ते आकाश साळुंखे, प्रदीप गायकवाड,अजिंक्य गायकवाड,दिनेश जाधव,अमोल तपासे,रवी सोनावणे यांच्यासह महिला व नागरिकांसह शाळेचे विद्यार्थी व वकील देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयासमोर पोलोसांनी या मोर्चास अडवल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

यावेळी मयत विद्यार्थी इंद्र मेघवाल हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. त्यांनतर सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्यासह शिष्ठमंडळाने भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. हे निवेदन शालेय विद्यार्थींनी तहसीदारांकडे सोपविले व या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली. 

दरम्यान, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात पाण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण व हत्या होते, ही घटना देशासाठी निंदनीय असून या घटनेस जबाबदार असलेल्या आरोपीस कठोर शासन करावे तसेच अशा प्रकारच्या देशातील घटनांना रोखण्यासाठी केंद्र शासनाने विशेषउपाय योजना करावी अन्यथा आरपीआय सेक्युलरच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी