शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आरपीआयच्या राष्ट्रीय उपाध्यक्षकाचं शेजाऱ्याशी भांडण, वाद सोडविण्यासाठी रामदास आठवलेंची कल्याणमध्ये धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:25 IST

Ramdas Athavale : पोलिसांनी बहादूरे व त्यांच्या शेजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे कळताच राष्ट्रीय उपाध्यक्षाच्या मदतीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले धावले.

कल्याण - कल्याण पश्चिमेला आरपीयाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे राहतात. त्यांच्या सोसायटीत त्यांच्या शेजाऱ्यांशी त्याचा वाद झाला. हा प्रकार कळताच हा वाद मिटविण्यासाठी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी सायंकाळी कल्याणमध्ये धाव घेतली. बहादुरे यांच्या घरी आठवले येणार असल्याने त्याठिकाणी पोलीसही पोहचले. सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार उपस्थित होते. दयाल बहादूरे यांचे शेजाऱ्यांसोबत भांडण झाले. या भांडणाचा वाद पोलीस ठाण्यात पोहचला. 

पोलिसांनी बहादूरे व त्यांच्या शेजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे कळताच राष्ट्रीय उपाध्यक्षाच्या मदतीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले धावले. त्यांनी बुधवारी सायंकाळी थेट कल्याण गाठले. बहादूरे यांच्या घरीच पोलिसांसमोर त्यांनी न्याय निवाडा करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी आठवले यांना घडल्या प्रकाराची पार्श्वभूमी कथन केली. तसेच तपास सुरू असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आठवले यांनी सांगितले की, एका इमारतीत राहणाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करुन वाद अथवा भांडण करू नये. एकमेकांना संभाळून घेत राहिले पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी उचित कारवाई करावी असे पोलिसांनी सूचित केले.

नवे वर्ष आर्थिकदृष्टय़ा चांगले असेल - आठवले

कोरोनामुळे 2020 वर्ष हे आर्थिक दृष्टय़ा, सामाजिक आणि आरोग्य दृष्टय़ा अत्यंत वाईट गेले. कोरोना काळात मला ही वाईट अनुभव आला. पाच राज्याचा दौरा करीत असताना लोकांशी संपर्क आाला. त्यामुळे मला देखील कोरोनाचा संसर्ग झाला. 11 दिवस बॉम्बे हॉस्पिटल उपचार घेतले. या काळात मी व्यायाम केला. वाचन केले. स्वत:चे 18 किलो वजन घटविले अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी दिली आहे. नवीन येणारे 2021 हे वर्ष आर्थिक दृष्टय़ा चांगले राहिल. कारण अनलॉकमध्ये सगळे व्यापार उद्योग सुरू झालेले आहे. मात्र कोरोना काही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सगळ्य़ांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सोशल डिस्टसिंगचा वापर, मास्कचा वापर केला पाहिजे. आरोग्य विषय नियम पाळले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रलय सामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण