शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील महावितरणचे रोहित्र बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:42 IST

लोखंडी जाळ्यांचे कुंपण तुटलेले : झाडेझुडपेही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसीमधील  निवासी भागातील  महावितरणचे बहुतांशी रोहित्र अतिधोकादायक बनली आहेत. ते रस्ते व इमारतींच्या कडेला असून, बहुतेक ठिकाणी त्यांचे संरक्षक कुंपण तुटल्याने एखादे वाहन त्यावर धडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच झाडेझुडपे व परिसरात पडलेला कचरा याला आग लागल्यास अपघातही घडू शकतो, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. 

महावितरणने एमआयडीसीतील रोहित्र व त्यांच्या तांत्रिक कारणांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे  गेल्या वर्षभरात अनेक वेळा रोहित्राला आग लागून स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. याबाबत वेळोवेळी पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन सांगूनही देखभाल होत नसल्याची खंत तेथील रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केली. नियमित साफसफाई, रोहित्रामधील ऑइल याची तपासणी योग्य वेळी झाली पाहिजे. रोहित्राला लागणारे किमती ऑइल रोहित्रामधून काढून चोरणारे समाजकंटक त्या ठिकाणी कुंपण नसल्याचा फायदा घेत असल्याचे ते म्हणाले. अशा अतिधोकादायक, देखभाल होत नसलेल्या रोहित्राची माहिती स्थानिक एमआयडीसी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही होताना दिसत नाही. काही वेळेस हे सर्व आमचा सिव्हिल खात्याकडे किंवा वरिष्ठांना पत्र देऊन कळवितो, असे महावितरणचे अधिकारी तोंडी सांगतात. मात्र, खरेच असे पत्र दिले आहे का, हे मात्र समजू शकलेले नसल्याचे ते म्हणाले. 

वीजपुरवठा खंडित झाल्यास होते गैरसोयnसध्या उन्हाळा असल्याने वीज वितरणवर ताण येत आहे. आताही काही भागात तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. वाढत उष्मा, वर्क फ्रॉम होम तसेच काही जण कोरोनामुळे घरातच विलगीकरणात आहे. त्यात वीज नसल्यास नागरिक मेटकुटीला येतात. nएमआयडीसीतील रोहित्राच्या स्थितीबद्दल वारंवार महावितरणचा वरिष्ठ अभियंत्यांना फोटोसह समाजमाध्यमांवर, मोबाइलवर कळवण्यात येत असूनही कार्यवाही का होत नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे नलावडे पुढे म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याण