शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

पाणीबिलांपोटी ३८ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:07 IST

कल्याण-डोंबिवली मनपा : ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीबिलांपोटी ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले असले तरी प्रत्यक्षात आतापर्यंत ३८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे ९० कोटींचे लक्ष्य साध्य होणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.केडीएमसी अधिकृत नळजोडण्याधारकांना वर्षातून चार वेळा पाणीबिले पाठवते. मात्र, ही बिले भरण्याकडे नागरिकांचा कल कमी आहे. एक दिवस पाणी आले नाही तर नागरिकांची महापालिकेविरोधात ओरड सुरू होते. पाणीबिलांचा भरणा मात्र वेळेवर केला जात नाही. पाणीबिलाच्या वसुलीपोटी वर्षाला ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापर्यंत कधीच दिलेले लक्ष्य गाठलेले नाही.

सन २०१८ मध्ये महापालिकेने ६५ कोटी रुपये पाणीबिलांची वसुली केली होती. यंदा मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे त्याचा पाणीबिलाच्या वसुलीवर परिणाम झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या हद्दीत पाण्याच्या अधिकृत जोडण्यांपेक्षा बेकायदा जोडण्यांचे प्रमाण जास्त आहे. अधिकृत नळजोडणीधारकही वेळेवर पाणी बिले भरत नाहीत.महापालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असली तरी महापालिकेचा देखभाल-दुरुस्तीवर होणारा खर्चही पाणीबिलाच्या वसुलीतून निघत नाही. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या गावांतूनही बिलांची वसुली होत नाही. तरीही एमआयडीसीकडे महापालिका पाणीबिलाचे पैसे भरते. पाणीबिलापोटी २७ गावांतून २३ कोटी रुपयांची वसुली होणे बाकी आहे. आता २७ पैकी १८ गावे वगळण्याचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे वसुलीवरही त्याचा परिणाम होत आहे.

पाणीगळतीचे प्रमाण २१ टक्के nकेडीएमसी हद्दीत पाणीगळतीचे प्रमाण २१ टक्के आहे. जागतिक पाणीगळतीच्या निकषांनुसार १५ टक्के पाणीगळती ग्राह्य धरली जाते. nमात्र महापालिकेच्या हद्दीतील पाणीगळती ही या निकषांपेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहे.nपाणीगळती व चोरीमुळे काही भागांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिक सांगतात.  ही गळती थांबवावी अशी मागणी हाेत आहे.

केवळ ६०० बेकायदा नळजोडण्यांचा शोध nबेकायदा नळजोडण्यांविरोधात महापालिका धडक मोहीम आखत नाही. बेकायदा नळजोडण्या शोधण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकडून योग्य प्रकारे काम झालेले नाही. nकेवळ ६०० बेकायदा नळजोडण्या शोधण्यात आल्या. त्या नियमित करण्याची प्रक्रियाही केलेली नाही.nपाणीचोरांविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. बेकायदा नळजोडण्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी वारंवार मुद्दा उचलून धरला आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ वरवरची कारवाई केली जाते. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका