शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

By अनिकेत घमंडी | Updated: January 6, 2023 15:02 IST

हेडफोन्स लावणाऱ्यांचे रस्ते अपघातात प्रमाण जास्त सेंट मेरीज शाळेचा ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शांती उत्सव

डोंबिवली: हेडफोन्स घालून वाहन चालवणारे चालक, रस्त्यावर चालणारे, आणि रेल्वे प्रवासी यांच्या निष्काळजीपणामुळे होतात. त्यामुळे हेडफोनला घाला आळा अन अपघात टाळा, ध्वनिप्रदूषण रोखायला नो हॉर्न ओके प्लिज या विषयावर जनजागृती करण्यासाठी कल्याण पूर्वच्या सेंट मेरीज शाळेने हिराली फाउंडेशन, यंगीस्तान फाउंडेशन आणि कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यानिमित्ताने एक हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतूक पोलिसांनी अपघाताचे प्रमुख कारण सांगत अनावश्यक हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण टाळा, त्यामुळे प्रसंगी बहिरेपणा येऊ शकतो, अशा पद्धतीने जनजागृती करून नो हॉर्न ओके प्लिज अशी सगळ्यांनी शपथ घेतली. गरज नसताना हॉर्न वाजूवून डोके भंडावून सोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याण पूर्व च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे दिल्याचे मुख्याध्यापक दिव्या बारसे यांनी सांगितले. 

कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे चांगले वर्तन नसून त्याद्वारे इतरांना त्रास देऊ नका असे आवाहन करण्यात आले. कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक मुलांनी हाती धरले होते. शाळेने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्ताने शांती वार्ता हा उपक्रम घेतल्याची माहिती शाळेच्या अनुपालन प्रमुख विंदा भुस्कुटे यांनी दिली. 

त्यावेळी व्यासपीठावर यंगिस्तान फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खानचंदानी, कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, हिराली संस्थेच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी, यंगिस्तान संस्थेचे संस्थापक आणि संयोजक मिथीलेश झा, आर्या ग्रुप शाळेचे संचालक भरत मलिक आदी उपस्थित होते. शांतिवार्ता उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना भुस्कुटे यांनी ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन केले. ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण सतर्कपणे आणि काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. 

कोळशेवाडी वाहतूक विभागाचे देशमुख यांनी सांगितले की, जेवढे रेल्वे ट्रॅक, कॅन्सरने मृत्यू होतात तितक्याच पटीने रस्ते अपघाती मृत्यू देखील होतात हे।गंभीर आहे. वाहनचालकाने वाहतूक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती करून दिली. खानचंदानी यांनी शाळेच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. हिरालीच्या सरिता खानचंदानी यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमाद्वारे फाउंडेशन आणि शाळा यांच्यामध्ये समन्वय साधला. 

मलिक यांनी फोन मुळे डोळ्यांचे, कानांचे किती मोठे नुकसान होते हे मुलांना पटवून दिले. येणाऱ्या पुढील समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मोबाईलची असेल असे देखील त्यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :dombivaliडोंबिवली