शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

By अनिकेत घमंडी | Updated: January 6, 2023 15:02 IST

हेडफोन्स लावणाऱ्यांचे रस्ते अपघातात प्रमाण जास्त सेंट मेरीज शाळेचा ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शांती उत्सव

डोंबिवली: हेडफोन्स घालून वाहन चालवणारे चालक, रस्त्यावर चालणारे, आणि रेल्वे प्रवासी यांच्या निष्काळजीपणामुळे होतात. त्यामुळे हेडफोनला घाला आळा अन अपघात टाळा, ध्वनिप्रदूषण रोखायला नो हॉर्न ओके प्लिज या विषयावर जनजागृती करण्यासाठी कल्याण पूर्वच्या सेंट मेरीज शाळेने हिराली फाउंडेशन, यंगीस्तान फाउंडेशन आणि कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यानिमित्ताने एक हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतूक पोलिसांनी अपघाताचे प्रमुख कारण सांगत अनावश्यक हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण टाळा, त्यामुळे प्रसंगी बहिरेपणा येऊ शकतो, अशा पद्धतीने जनजागृती करून नो हॉर्न ओके प्लिज अशी सगळ्यांनी शपथ घेतली. गरज नसताना हॉर्न वाजूवून डोके भंडावून सोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याण पूर्व च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे दिल्याचे मुख्याध्यापक दिव्या बारसे यांनी सांगितले. 

कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे चांगले वर्तन नसून त्याद्वारे इतरांना त्रास देऊ नका असे आवाहन करण्यात आले. कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक मुलांनी हाती धरले होते. शाळेने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्ताने शांती वार्ता हा उपक्रम घेतल्याची माहिती शाळेच्या अनुपालन प्रमुख विंदा भुस्कुटे यांनी दिली. 

त्यावेळी व्यासपीठावर यंगिस्तान फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खानचंदानी, कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, हिराली संस्थेच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी, यंगिस्तान संस्थेचे संस्थापक आणि संयोजक मिथीलेश झा, आर्या ग्रुप शाळेचे संचालक भरत मलिक आदी उपस्थित होते. शांतिवार्ता उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना भुस्कुटे यांनी ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन केले. ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण सतर्कपणे आणि काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. 

कोळशेवाडी वाहतूक विभागाचे देशमुख यांनी सांगितले की, जेवढे रेल्वे ट्रॅक, कॅन्सरने मृत्यू होतात तितक्याच पटीने रस्ते अपघाती मृत्यू देखील होतात हे।गंभीर आहे. वाहनचालकाने वाहतूक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती करून दिली. खानचंदानी यांनी शाळेच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. हिरालीच्या सरिता खानचंदानी यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमाद्वारे फाउंडेशन आणि शाळा यांच्यामध्ये समन्वय साधला. 

मलिक यांनी फोन मुळे डोळ्यांचे, कानांचे किती मोठे नुकसान होते हे मुलांना पटवून दिले. येणाऱ्या पुढील समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मोबाईलची असेल असे देखील त्यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :dombivaliडोंबिवली