शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

By अनिकेत घमंडी | Updated: January 6, 2023 15:02 IST

हेडफोन्स लावणाऱ्यांचे रस्ते अपघातात प्रमाण जास्त सेंट मेरीज शाळेचा ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शांती उत्सव

डोंबिवली: हेडफोन्स घालून वाहन चालवणारे चालक, रस्त्यावर चालणारे, आणि रेल्वे प्रवासी यांच्या निष्काळजीपणामुळे होतात. त्यामुळे हेडफोनला घाला आळा अन अपघात टाळा, ध्वनिप्रदूषण रोखायला नो हॉर्न ओके प्लिज या विषयावर जनजागृती करण्यासाठी कल्याण पूर्वच्या सेंट मेरीज शाळेने हिराली फाउंडेशन, यंगीस्तान फाउंडेशन आणि कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यानिमित्ताने एक हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतूक पोलिसांनी अपघाताचे प्रमुख कारण सांगत अनावश्यक हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण टाळा, त्यामुळे प्रसंगी बहिरेपणा येऊ शकतो, अशा पद्धतीने जनजागृती करून नो हॉर्न ओके प्लिज अशी सगळ्यांनी शपथ घेतली. गरज नसताना हॉर्न वाजूवून डोके भंडावून सोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याण पूर्व च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे दिल्याचे मुख्याध्यापक दिव्या बारसे यांनी सांगितले. 

कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे चांगले वर्तन नसून त्याद्वारे इतरांना त्रास देऊ नका असे आवाहन करण्यात आले. कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक मुलांनी हाती धरले होते. शाळेने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्ताने शांती वार्ता हा उपक्रम घेतल्याची माहिती शाळेच्या अनुपालन प्रमुख विंदा भुस्कुटे यांनी दिली. 

त्यावेळी व्यासपीठावर यंगिस्तान फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खानचंदानी, कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, हिराली संस्थेच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी, यंगिस्तान संस्थेचे संस्थापक आणि संयोजक मिथीलेश झा, आर्या ग्रुप शाळेचे संचालक भरत मलिक आदी उपस्थित होते. शांतिवार्ता उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना भुस्कुटे यांनी ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन केले. ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण सतर्कपणे आणि काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. 

कोळशेवाडी वाहतूक विभागाचे देशमुख यांनी सांगितले की, जेवढे रेल्वे ट्रॅक, कॅन्सरने मृत्यू होतात तितक्याच पटीने रस्ते अपघाती मृत्यू देखील होतात हे।गंभीर आहे. वाहनचालकाने वाहतूक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती करून दिली. खानचंदानी यांनी शाळेच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. हिरालीच्या सरिता खानचंदानी यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमाद्वारे फाउंडेशन आणि शाळा यांच्यामध्ये समन्वय साधला. 

मलिक यांनी फोन मुळे डोळ्यांचे, कानांचे किती मोठे नुकसान होते हे मुलांना पटवून दिले. येणाऱ्या पुढील समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मोबाईलची असेल असे देखील त्यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :dombivaliडोंबिवली