शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

प्रत्येक संचालकांच्या घरासमोर आंदोलन गरजेचे : रवींद्र चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 07:12 IST

विनाअनुदानित प्रस्तावाला शासनाचा विरोध; 'सेव्ह पेंढरकर' ला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: 'सेव्ह पेंढरकर कॉलेज' या आंदोलनाला माझा आणि भाजपचा जाहीर पाठिंबा आहे. विनाअनुदानितच्या प्रस्तावाला शासनाचा कायम विरोध राहणार आहे. संचालकांनी उच्च न्यायालयात शासनाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. तेथे लढण्यासाठी चांगला वकील देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांची बाजू लावून धरेल आणि न्याय मिळवून देईल. परंतु, सध्या पुकारलेले आंदोलन मर्यादित न राहता प्रत्येक संचालकाच्या घरासमोर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी साखळी उपोषणस्थळी आयोजित जाहीर सभेत केले. पेंढरकर कॉलेजच्या गेटसमोर साखळी उपोषणाच्या ठिकाणी रविवारी संध्याकाळी जाहीर सभा झाली.

...अशा वृत्तीला आम्ही ठेचून काढूयावेळी विशेष बाब म्हणजे डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांचे पुत्र अजिंक्य देसाई यांच्यासह कॉम्रेड क्रांती जेजुरकर, माजी शिक्षक व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेला मंत्री चव्हाण यांनी उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने अनुदानित महाविद्यालये सुरू केली आहेत. या उद्देशाला कोण हरताळ फासत असेल तर आणि ज्याला हे महाविद्यालय सरकारने सांभाळायला दिलेय, तो मालक म्हणून मनमानी करत असेल तर आमचा विरोध आहेच, पण अशा वृतीला आम्ही ठेचून काढू, असा इशारा त्यांनी दिला.

...तर पदवीधर आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारमंत्री चव्हाण यांच्या आगमनापूर्वी आंदोलनाचे संयोजक माजी विद्यार्थी सोनू सुरवसे आणि अन्य माजी विदयार्थी, आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शंभर टक्के अनुदान बंद करण्याचा घाट इथल्या संचालकांनी घातला आहे. परंतु, पदवीधर निवडणुकीनिमित्त राजकीय मंडळी इतर शाळा, महाविद्यालयांना अनुदान देण्याची घोषणा करीत आहेत. त्यांचे पेंढरकर महाविद्यालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. २६ जूनपर्यंत के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयावर प्रशासक नेमला नाही, तर पदवीधर निवडणुकीसह, विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. 

एक घाव दोन तुकडे कराआंदोलनाचा लढा लवकरात लवकर संपविणे गरजेचे आहे. आजी, माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यातच एक घाव दोन तुकडे करायला हरकत नाही. गरज लागल्यास कॅबिनेट बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी विनंती अजिंक्य देसाई यांनी उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांना केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली