शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ तास नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन

By मुरलीधर भवार | Updated: August 29, 2024 15:35 IST

नितीन निकम यांनी आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तासात नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.

कल्याण - काेट्यवधी जनतेची तहान भागविणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणाकडे सरकारी यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तासात नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.

निकम यांच्या आंदोलनास माजी नगरसेवक कैलास शिंदे, उमेश बाेरगावकर यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर निकम यांची आंदोलनस्थळी जाऊन शिंदे सेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे आणि महेश गायकवाड यांनी भेट घेतली.

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. या नदीतून विविध सरकारी संस्था पाणी उचलतात. या नदीत रासायनिक सांडपाणी आणि घरगूती सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसह मी कल्याणकर संस्था कार्यरत आहे. गेल्या दहा वर्षापासून निकम हे सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहे. यापूर्वही नदी पात्रात निकम यांनी दिवसरात्र अनेक दिवस आंदोलन केले आहे.

नदीचे प्रदूषण रोखण्याकरीता त्यांनी विविध सरकारी संस्थांकडे पाठपुरावा करुन देखील प्रदूषण रोखले जात नाही. निकम यांच्या आंदोलनाची दखल यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांच्यासह आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यावेळी पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री होते. नदी प्रदूषण रोखण्याचे आदेश सरकारी यंत्रणाना दिले होते. त्यांच्या आदेशापश्चातही येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती आहे. त्यामुळे आज निकम यांनी पुन्हा नदी पात्रातील पाण्यात १२ तास उभे राहून आंदोलन करीत सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.

निकम यांनी सांगितले की, २०२१ साली नदी पात्रात आंदोलन केले. त्यावेळी महापालिकेने नदी पात्रात येऊन मिळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याचे आश्वासन दिले होते. हे काम ३१ मे २०२१ पर्यंत मार्गी लावले जाईल असे म्हटले होते. त्या पश्चातही महापालिका हद्दीतील गाळेगाव आणि माेहने येथील सांडपाण्याचा नाला थेट नदी पात्रात येऊन मिळतो. सांडपाणी आणि मलमूत्र थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदी पात्रात दरवर्षी जलपर्णीची समस्या उद्भवते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे. नाले तातडीनने वळविले जावेत. नदीचे प्रदूषण रोखण्याची उपाययोजना तातडीने करावी या मागणीकडे निकम यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण