शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ तास नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन

By मुरलीधर भवार | Updated: August 29, 2024 15:35 IST

नितीन निकम यांनी आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तासात नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.

कल्याण - काेट्यवधी जनतेची तहान भागविणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणाकडे सरकारी यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तासात नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.

निकम यांच्या आंदोलनास माजी नगरसेवक कैलास शिंदे, उमेश बाेरगावकर यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर निकम यांची आंदोलनस्थळी जाऊन शिंदे सेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे आणि महेश गायकवाड यांनी भेट घेतली.

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. या नदीतून विविध सरकारी संस्था पाणी उचलतात. या नदीत रासायनिक सांडपाणी आणि घरगूती सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसह मी कल्याणकर संस्था कार्यरत आहे. गेल्या दहा वर्षापासून निकम हे सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहे. यापूर्वही नदी पात्रात निकम यांनी दिवसरात्र अनेक दिवस आंदोलन केले आहे.

नदीचे प्रदूषण रोखण्याकरीता त्यांनी विविध सरकारी संस्थांकडे पाठपुरावा करुन देखील प्रदूषण रोखले जात नाही. निकम यांच्या आंदोलनाची दखल यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांच्यासह आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यावेळी पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री होते. नदी प्रदूषण रोखण्याचे आदेश सरकारी यंत्रणाना दिले होते. त्यांच्या आदेशापश्चातही येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती आहे. त्यामुळे आज निकम यांनी पुन्हा नदी पात्रातील पाण्यात १२ तास उभे राहून आंदोलन करीत सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.

निकम यांनी सांगितले की, २०२१ साली नदी पात्रात आंदोलन केले. त्यावेळी महापालिकेने नदी पात्रात येऊन मिळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याचे आश्वासन दिले होते. हे काम ३१ मे २०२१ पर्यंत मार्गी लावले जाईल असे म्हटले होते. त्या पश्चातही महापालिका हद्दीतील गाळेगाव आणि माेहने येथील सांडपाण्याचा नाला थेट नदी पात्रात येऊन मिळतो. सांडपाणी आणि मलमूत्र थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदी पात्रात दरवर्षी जलपर्णीची समस्या उद्भवते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे. नाले तातडीनने वळविले जावेत. नदीचे प्रदूषण रोखण्याची उपाययोजना तातडीने करावी या मागणीकडे निकम यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण