शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

कचरा पेटवून केला निषेध! माजी नगरसेवकासह नागरीक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 19:09 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणचा कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणचा कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नांदिवली परिसरातील संतप्त नागरीकांनी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने साचलेला कचरा पेटवून देत प्रशासनाचा निषेध केला. प्रशासनाने दखल घेतली नाही तर यापूढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

27 गावातील कचरा उचलला जात नाही. कच:या उचलला जात नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत माजी अपक्ष नगरसेवक पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार लक्ष वेधले ाहे. प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही.  महापालिकेच्या अनास्थेला कंटाळून संतप्त नागरीकांच्या उपस्थित माजी नगरसेवक पाटील यांनी आज दुपारी नांदिवली येथील रस्त्यावर न उचललेल्या कच:याला आग लावून पेटून दिला. कचरा पेटवून महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

महापालिकेने मे 2020 पासून शून्य कचरा मोहिम सुरु केली आहे. महापालिका हद्दीत कोरोना काळ सुरु असताना शून्य कचरा मोहिम राबविण्यास काही नगरसेवकांचा विरोध होता. तर काही नगरसेवकांनी त्याचे समर्थन केले होते. महापालिकेने शून्य कचरा मोहिम राबवित असताना कचरा कुंडय़ा काढून टाकल्या होत्या. नागरीकांनी कचरा वर्गीकरण द्यावा असे आवाहन केले होते. ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन द्यावा अशी सक्ती महापालिकेने केली आहे. मात्र जे नागरीक ओला सुका कचरा वर्गीकरण करुन देत नाही. त्यांचा कचरा महापालिका स्विकारत नाही. त्यामुळे त्यांचा कचरा रस्त्यावर टाकला जातो.  टाकण्यात आलेला कचरा महापालिकेचे सफाई कर्मचारी उचलून कचरा गाडीत टाकत नाही. महापालिकेच्या शहरी भागात शून्य कचरा मोहिम चांगल्या प्रकारे राबविली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात 27 गावे महापालिकेत होती. त्यापैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 9 गावे महापालिकेत आहेत. गावे वगळण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. 27 गावातील कचरा योग्य प्रकारे नियमीत उचलला जात नाही. 27 गावीत प्रत्येक ठिकाणी कचरा उचलला जात नाही, असा नागरीकांचा आरोप आहे.

टॅग्स :kalyanकल्याण