शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

पाणी टंचाईच्या विरोधात केडीएमसीच्या 'अ' प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा

By मुरलीधर भवार | Updated: December 17, 2024 17:39 IST

महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.

कल्याण : टिटवाळा मांडा परिसरातील नागरीक पाणी टंचाईने हैराण आहे. त्यांच्या पाण्याची समस्या सोडविली जात नसल्याने संतप्त झालेला महिलांनी भाजपच्या माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर धडक हंडा कळशी मोर्चा काढला. यावेळी महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.

माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका भोईर यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा येथून काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी शक्तीवान भोईर, रुपेश भोईर, दीपक कांबळे, किरण रोटे, सारीका पाटील, गजानन मढवी यांच्यासह असंख्य महिला पुरुष आणि लहान मुले या हंडा कळशी मोर्चात सहभागी झाले होते. माजी उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून टिटवाळा मांडा परिसरात पाण्याची समस्या आहे. यापूर्वीही पाणी समस्या दूर करण्याच्या मागणीकरीता धडक मोर्चा काढला आहे. आत्ता या भागातील पाणी खात्यातील उपअभियंता अनिरुद्ध सराफ हे नागरीकांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्याला योग्य ते उत्तर देत नाही. 

महापालिका हद्दीतील मांडा टिटवाळा परिसरातील नागरीक महापालिकेस पाणी आणि मालमत्ता कर भरतात. तरी देखील महापालिकेकडून पाणी पुरवठा आणि अन्य नागरी सोयी सुविधा नागरीकांना पुरविल्या जात नाही. टिटवाळा परिसरातील नागरीकांना महापालिका प्रशासनाकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाला जाब विचारण्याकरीता नगरसेवकांचे सदस्य मंडळ नाही. त्यामुळे प्रशासन निर्ढावलेले आहे. नागरीकांची पाणी समस्या सोडविली नाही. तर यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेच्या मुख्यालयावर काढला जाईल असा इशारा भोईर यांनी प्रशासनाला दिला.

या वेळी मोर्चाला पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे हे सामोरे गेले. त्यांनी मार्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्याचबरोबर टिटवाळा मांडा पश्चिमेतील रेल्वे मार्गाच्या खालून जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर जलकुंभ उभारण्याचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. ही दोन कामे मार्गी लावल्यानंतर पाणी समस्या सूटण्यास मदत होणार आहे. त्याचबोबर येत्या आठ दिवसात टिटवाळा मांडा परिसरातील बेकायदा नळ जाेडण्या ताेडण्याची कारवाई केली जाणार आहे. टिटवाळा मांडा परिसरात बेकायदा बांधकामे असल्याचे घाेडे यांनी मान्य करीत त्यामळेच पाणी टंचाईची समस्या उद्धवली असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :kalyanकल्याण