शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

पाणी टंचाईच्या विरोधात केडीएमसीच्या 'अ' प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा

By मुरलीधर भवार | Updated: December 17, 2024 17:39 IST

महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.

कल्याण : टिटवाळा मांडा परिसरातील नागरीक पाणी टंचाईने हैराण आहे. त्यांच्या पाण्याची समस्या सोडविली जात नसल्याने संतप्त झालेला महिलांनी भाजपच्या माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर धडक हंडा कळशी मोर्चा काढला. यावेळी महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.

माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका भोईर यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा येथून काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी शक्तीवान भोईर, रुपेश भोईर, दीपक कांबळे, किरण रोटे, सारीका पाटील, गजानन मढवी यांच्यासह असंख्य महिला पुरुष आणि लहान मुले या हंडा कळशी मोर्चात सहभागी झाले होते. माजी उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून टिटवाळा मांडा परिसरात पाण्याची समस्या आहे. यापूर्वीही पाणी समस्या दूर करण्याच्या मागणीकरीता धडक मोर्चा काढला आहे. आत्ता या भागातील पाणी खात्यातील उपअभियंता अनिरुद्ध सराफ हे नागरीकांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्याला योग्य ते उत्तर देत नाही. 

महापालिका हद्दीतील मांडा टिटवाळा परिसरातील नागरीक महापालिकेस पाणी आणि मालमत्ता कर भरतात. तरी देखील महापालिकेकडून पाणी पुरवठा आणि अन्य नागरी सोयी सुविधा नागरीकांना पुरविल्या जात नाही. टिटवाळा परिसरातील नागरीकांना महापालिका प्रशासनाकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाला जाब विचारण्याकरीता नगरसेवकांचे सदस्य मंडळ नाही. त्यामुळे प्रशासन निर्ढावलेले आहे. नागरीकांची पाणी समस्या सोडविली नाही. तर यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेच्या मुख्यालयावर काढला जाईल असा इशारा भोईर यांनी प्रशासनाला दिला.

या वेळी मोर्चाला पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे हे सामोरे गेले. त्यांनी मार्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्याचबरोबर टिटवाळा मांडा पश्चिमेतील रेल्वे मार्गाच्या खालून जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर जलकुंभ उभारण्याचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. ही दोन कामे मार्गी लावल्यानंतर पाणी समस्या सूटण्यास मदत होणार आहे. त्याचबोबर येत्या आठ दिवसात टिटवाळा मांडा परिसरातील बेकायदा नळ जाेडण्या ताेडण्याची कारवाई केली जाणार आहे. टिटवाळा मांडा परिसरात बेकायदा बांधकामे असल्याचे घाेडे यांनी मान्य करीत त्यामळेच पाणी टंचाईची समस्या उद्धवली असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :kalyanकल्याण