शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पाणी टंचाईच्या विरोधात केडीएमसीच्या 'अ' प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा

By मुरलीधर भवार | Updated: December 17, 2024 17:39 IST

महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.

कल्याण : टिटवाळा मांडा परिसरातील नागरीक पाणी टंचाईने हैराण आहे. त्यांच्या पाण्याची समस्या सोडविली जात नसल्याने संतप्त झालेला महिलांनी भाजपच्या माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर धडक हंडा कळशी मोर्चा काढला. यावेळी महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.

माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका भोईर यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा येथून काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी शक्तीवान भोईर, रुपेश भोईर, दीपक कांबळे, किरण रोटे, सारीका पाटील, गजानन मढवी यांच्यासह असंख्य महिला पुरुष आणि लहान मुले या हंडा कळशी मोर्चात सहभागी झाले होते. माजी उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून टिटवाळा मांडा परिसरात पाण्याची समस्या आहे. यापूर्वीही पाणी समस्या दूर करण्याच्या मागणीकरीता धडक मोर्चा काढला आहे. आत्ता या भागातील पाणी खात्यातील उपअभियंता अनिरुद्ध सराफ हे नागरीकांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्याला योग्य ते उत्तर देत नाही. 

महापालिका हद्दीतील मांडा टिटवाळा परिसरातील नागरीक महापालिकेस पाणी आणि मालमत्ता कर भरतात. तरी देखील महापालिकेकडून पाणी पुरवठा आणि अन्य नागरी सोयी सुविधा नागरीकांना पुरविल्या जात नाही. टिटवाळा परिसरातील नागरीकांना महापालिका प्रशासनाकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाला जाब विचारण्याकरीता नगरसेवकांचे सदस्य मंडळ नाही. त्यामुळे प्रशासन निर्ढावलेले आहे. नागरीकांची पाणी समस्या सोडविली नाही. तर यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेच्या मुख्यालयावर काढला जाईल असा इशारा भोईर यांनी प्रशासनाला दिला.

या वेळी मोर्चाला पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे हे सामोरे गेले. त्यांनी मार्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्याचबरोबर टिटवाळा मांडा पश्चिमेतील रेल्वे मार्गाच्या खालून जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर जलकुंभ उभारण्याचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. ही दोन कामे मार्गी लावल्यानंतर पाणी समस्या सूटण्यास मदत होणार आहे. त्याचबोबर येत्या आठ दिवसात टिटवाळा मांडा परिसरातील बेकायदा नळ जाेडण्या ताेडण्याची कारवाई केली जाणार आहे. टिटवाळा मांडा परिसरात बेकायदा बांधकामे असल्याचे घाेडे यांनी मान्य करीत त्यामळेच पाणी टंचाईची समस्या उद्धवली असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :kalyanकल्याण