शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

एमआयडीसीत बांधलेले नाले, गटार, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे? डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने घेतला आक्षेप 

By अनिकेत घमंडी | Updated: October 10, 2022 14:02 IST

एमआयडीसीला दिले पत्र 

डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी प्राधिकरणाने नवीन नाले,गटारी बांधण्याचे काम नुकतेच केले. मात्र ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, तांत्रिक दृष्ट्या चुकीचे असल्याचे रहिवाश्यांच्या निर्दशनास आले आहे. त्या कामाची चौकशी करावी आणि तातडीने आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अन्यथा जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा संस्थेचे सचिव राजू नलावडे यांनी सोमवारी पत्राद्वारे दिला आहे. 

त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी अद्याप जुनीच, बुजलेली गटारे तशीच ठेवण्यात आली आहेत. याबाबतीत एमआयडीसी कार्यालयात विचारणा केली असता सदर कामांसाठी आलेला निधी संपल्याने अनेक ठिकाणी नवीन गटारी बांधण्यात आली नसल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. जी गटारे,नाले बांधण्यात आली ती तांत्रिक बाबींचा विचार न करता निकृष्ट दर्जाची बांधल्यामुळे या पावसाळ्यात नेहमी प्रमाणे पावसाळी पाणी हे रस्त्यावर आलेच शिवाय ही बांधलेली नवीन गटारींचा पावसाळी पाणी जाणारा प्रवाह हा कुठे थांबलेला, तुंबलेला तर काही ठिकाणी गटारातील पाणी वाहण्याचा प्रवाह हा गटारीची रुंदी,खोली कमी जास्त असल्याने त्यातून अतिशय संथ गतीने पाण्याचा निचरा झाला. 

काही ठिकाणी गटारींचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याचे दिसत आहे. आपल्याकडून या ठेकेदार द्वारा बांधण्यात येत असलेल्या नवीन गटारी बांधकामावर देखरेख, नियंत्रण नसल्याने या गटारी,नाले यासाठी आलेला निधीचा योग्य वापर न झाल्याचा व त्यात भ्रष्टाचार झालेला दिसत असून हा जनतेचा पैशाचा दुरुपयोग झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. 

निवासी आणि औद्योगिक भागातील ड्रेनेज सिस्टीम, सांडपाणी वाहिन्या/चेंबर्स या अंदाजे ४५ वर्षे जुन्या झाल्याने त्या अनेक ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत. त्या जागोजागी फुटल्याचे आणि चेंबर्स तुंबल्याने त्यातून घरगुती व रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचे दिसते. यामुळे दुर्गंधी येऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन येथील नागरिकांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. याबद्दल वारंवार तक्रारी कराव्या लागत आहेत. 

एमआयडीसीकडून याबाबतीत नवीन ड्रेनेज वाहिन्या बांधण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे गेल्या दोन वर्षापासून सांगण्यात येत आहे, पण असे असतानाही नागरिकांकडून ड्रेनेज कर दर महिन्याला पाण्याचा बिलाबरोबर सुरुवाती पासून का घेतला जात असल्याचे नलावडे म्हणाले. शिवाय केडीएमसी पण हाच कर घेतला जातो तो वेगळाच असल्याचे ते म्हणाले. एमआयडीसी मध्ये नवीन काँक्रिटचे रस्ते होणार म्हणून मागील दोन वर्षांपासून केवळ आश्वासन मिळत असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक भागातील रस्ते काम एमआयडीसी कडून अतिशय संथ गतीने करण्यात येत आहे तर निवासी विभागातील रस्ते काम हे अद्याप चालू करण्यात आले नाही आहे. 

एमआयडीसी मधील रस्त्यांची दुर्दशा अतिशय खराब झाली आहे हे आपणास माहितीच आहे. सदर रस्त्यांचे काम चालू होण्यापूर्वी तातडीने गटारी,नाले,ड्रेनेज सांडपाणी वाहिन्या यांचे काम करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर बनविण्यात येणाऱ्या नवीन रस्त्यांची पण लवकरच दुर्दशा झालेली पाहण्यास मिळेल. या सर्व बाबींकडे गांभीर्याने बघावे आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असेही ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका