शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत बांधलेले नाले, गटार, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे? डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने घेतला आक्षेप 

By अनिकेत घमंडी | Updated: October 10, 2022 14:02 IST

एमआयडीसीला दिले पत्र 

डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी प्राधिकरणाने नवीन नाले,गटारी बांधण्याचे काम नुकतेच केले. मात्र ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, तांत्रिक दृष्ट्या चुकीचे असल्याचे रहिवाश्यांच्या निर्दशनास आले आहे. त्या कामाची चौकशी करावी आणि तातडीने आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अन्यथा जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा संस्थेचे सचिव राजू नलावडे यांनी सोमवारी पत्राद्वारे दिला आहे. 

त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी अद्याप जुनीच, बुजलेली गटारे तशीच ठेवण्यात आली आहेत. याबाबतीत एमआयडीसी कार्यालयात विचारणा केली असता सदर कामांसाठी आलेला निधी संपल्याने अनेक ठिकाणी नवीन गटारी बांधण्यात आली नसल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. जी गटारे,नाले बांधण्यात आली ती तांत्रिक बाबींचा विचार न करता निकृष्ट दर्जाची बांधल्यामुळे या पावसाळ्यात नेहमी प्रमाणे पावसाळी पाणी हे रस्त्यावर आलेच शिवाय ही बांधलेली नवीन गटारींचा पावसाळी पाणी जाणारा प्रवाह हा कुठे थांबलेला, तुंबलेला तर काही ठिकाणी गटारातील पाणी वाहण्याचा प्रवाह हा गटारीची रुंदी,खोली कमी जास्त असल्याने त्यातून अतिशय संथ गतीने पाण्याचा निचरा झाला. 

काही ठिकाणी गटारींचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याचे दिसत आहे. आपल्याकडून या ठेकेदार द्वारा बांधण्यात येत असलेल्या नवीन गटारी बांधकामावर देखरेख, नियंत्रण नसल्याने या गटारी,नाले यासाठी आलेला निधीचा योग्य वापर न झाल्याचा व त्यात भ्रष्टाचार झालेला दिसत असून हा जनतेचा पैशाचा दुरुपयोग झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. 

निवासी आणि औद्योगिक भागातील ड्रेनेज सिस्टीम, सांडपाणी वाहिन्या/चेंबर्स या अंदाजे ४५ वर्षे जुन्या झाल्याने त्या अनेक ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत. त्या जागोजागी फुटल्याचे आणि चेंबर्स तुंबल्याने त्यातून घरगुती व रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचे दिसते. यामुळे दुर्गंधी येऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन येथील नागरिकांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. याबद्दल वारंवार तक्रारी कराव्या लागत आहेत. 

एमआयडीसीकडून याबाबतीत नवीन ड्रेनेज वाहिन्या बांधण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे गेल्या दोन वर्षापासून सांगण्यात येत आहे, पण असे असतानाही नागरिकांकडून ड्रेनेज कर दर महिन्याला पाण्याचा बिलाबरोबर सुरुवाती पासून का घेतला जात असल्याचे नलावडे म्हणाले. शिवाय केडीएमसी पण हाच कर घेतला जातो तो वेगळाच असल्याचे ते म्हणाले. एमआयडीसी मध्ये नवीन काँक्रिटचे रस्ते होणार म्हणून मागील दोन वर्षांपासून केवळ आश्वासन मिळत असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक भागातील रस्ते काम एमआयडीसी कडून अतिशय संथ गतीने करण्यात येत आहे तर निवासी विभागातील रस्ते काम हे अद्याप चालू करण्यात आले नाही आहे. 

एमआयडीसी मधील रस्त्यांची दुर्दशा अतिशय खराब झाली आहे हे आपणास माहितीच आहे. सदर रस्त्यांचे काम चालू होण्यापूर्वी तातडीने गटारी,नाले,ड्रेनेज सांडपाणी वाहिन्या यांचे काम करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर बनविण्यात येणाऱ्या नवीन रस्त्यांची पण लवकरच दुर्दशा झालेली पाहण्यास मिळेल. या सर्व बाबींकडे गांभीर्याने बघावे आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असेही ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका