शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

धोकादायक मुन्ना मौलवी इमारत खाली करण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणार

By मुरलीधर भवार | Updated: June 28, 2024 19:52 IST

कल्याण-कल्याण रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाऊंडनजीक असलेल्या मुन्ना मौलवी या धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी आज पुन्हा महापालिका मुख्यालयात धाव घेतली. महापालिका ...

कल्याण-कल्याण रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाऊंडनजीक असलेल्या मुन्ना मौलवी या धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी आज पुन्हा महापालिका मुख्यालयात धाव घेतली. महापालिका आम्हाला घरातून जबरदस्तीने बाहेर काढू शकत नाही. कारण आम्ही सामान्य लोक आहे. आम्हाला भाड्याने घर घेणे शक्य होणार नाही. नागरीकांचा घरे खाली करण्यास विरोध असला तरी महापालिा प्रशासनाकडून त्यांना काेणतेही आश्वासन दिले गेले नाही. उलट त्यांनी घरे खाली केली नाही तर पाेलिस बळाचा वापर करुन इमारत खाली केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

मौलवी कंपाऊंडनजीक असलेल्या मुन्ना मौलवी ही तळ अधिकचार मजली इमारत धोकादायक आहे. ही इमारत धोकादायक असल्याने या इमारतीला महापालिका प्रशासनाकडून नोटिस बजावली जाते. घरे खाली करण्यासाठी बजावण्यात आलेली नोटिस या इमारतीच्या मालकीन शगुफ्ता मुनीर मौलवी यांनी नोटिस स्वीकारली नव्हती. २२ जून रोजी इमारतीच्या चौथ्या मजल्याचा सज्जा कोसळून एक महिला व तिची लहान मुलगी जखमी झाली होती. त्यानंतर महापालिकेने ही इमारत तातडीने खाली करण्याची प्रक्रिया सुरु केली. इमारत खाली केल्यावर भोगवटा प्रमाणपत्र दिले जाईल असे महापालिकेने सांगितले. ७५ कुटुंबियांपैकी काही जणांनी घरे खाली केली. त्यांना भोगवटा प्रमामपत्र दिले गेले नाही. त्यामुळे उर्वरीत नागरीकांनी घरे खाली केली नाही. आधी भोगवटा प्रमाणपत्र द्या मगच घरे खाली करणार असा पावित्रा घेतला. ज्या नागरीकांनी घरे खाली केली होती. ते सुद्धा पुन्हा त्याच इमारत राहण्यासाठी आले.

हापालिकेने इमारतीच्या मालकीण शगुफ्ता मुनीर मौलवी यांच्या विरोधात महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मौलवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आज पुन्हा या इमारतीमधील नागरीकांनी का’ंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयुक्त जाखड यांची भेट घेतली. या इमारती राहणारे सर्व कुटुंबिय हे सामान्य आहे. ते भाडेकरु आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते भाड्याने त्या इमारतीत राहतात. त्याना अन्य ठिकाणी भाड्याने घर घेण्याची आर्थिक कुवत नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन महापालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पातील घरांमध्ये करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीकरीता राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे त्यांना बीएसयूपीच्या घरात स्थलांतरीत करता येणार नाही. त्यांचे स्थलांतर महापालिकेच्या रात्र निवारा केंद्रात केले जाईल. त्यावर नागरीकांनी असा मुद्दा उपस्थित केला की, रात्र निवारा केंद्रात ७५ कुटुंबियांसाठी पुरेशी जागा आहे. महिला आणि पुरुष एकाच ठिकाणी कसे काय झोपू शकतात याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर प्रशासन निरुत्तर होते. नागरीकांनी घरे खाली केली नाही तर पोलिस बळाचा वापर करुन घरे खाली करण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.