शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी वसाहतीच्या पाडकामास विरोध, २५ कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 16:57 IST

kalyan : पोलिसांनी कंपनीच्या २५ कामगारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या दंडकूशाहीचा कामगारांनी निषेध व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देएनआरसी कंपनी गेल्या १३ वर्षापासून बंद आहे. बंद असलेल्या साडे चार हजार कामगारांची देणी अद्याप दिलेली नाही.

एनआरसी वसाहतीच्या  पाडकामास विरोध, २५ कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कल्याण : आंबिवली मोहने नजीक असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना अदानी ग्रुपतर्फे कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याला कामगारांनी विरोध केला असता कामगारांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी कंपनीच्या २५ कामगारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या दंडकूशाहीचा कामगारांनी निषेध व्यक्त केला आहे.

एनआरसी कंपनी गेल्या १३ वर्षापासून बंद आहे. बंद असलेल्या साडे चार हजार कामगारांची देणी अद्याप दिलेली नाही. १३०० कोटी रुपयांची थकीत देण्याचा दावा न्यायप्रविष्ट आहे. केंद्रीय नॅशल ट्रब्युनल कंपनी लॉ दिल्ली लवादाकडे कामगार संघटनांनी दावा केला आहे. हा दावा न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणीची तारीख उद्या २१ जानेवारी रोजी आहे. दरम्यान, कंपनीची जागा अदानी ग्रुपने घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा ठोस पुरावा कंपनी व्यवस्थापनाकडून कामगार संघटनांना सादर केलेला नाही. अदानी ग्रुपने कंपनी कामगारांना प्रत्येकी ११ हजार रुपये विना अटी शर्तीवर देण्याची जाहिरात दिली होती. ही रक्कम घेण्यास कामगारांनी नकार दिला आहे. 

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसापासून कंपनीच्या वसाहतीतील जुने बंगले तोडण्याचे काम अदानी ग्रुपकडून सुरु आहे. त्यावर कंपनी व्यवस्थापनानेकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. या तोडकामाला कामगारांनी वारंवार विरोध केला आहे. न्यायालयाचा आदेश नसताना तसेच देणी देण्याचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आज बुलडोझर घेऊन कंपनी कामगार वसाहतीतील घरे पाडण्याचे काम सुरु होता. त्याला कामगारांनी तीव्र विरोध केला. हा विरोध पोलिसांनी मोडीत काढत असताना कामगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

विरोध करणाऱ्या महिला पुरुष अशा २५ कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या २५ कामगारांना खडकपाडा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये कामगार रामदास वळसे पाटील,भीमराव डोळस, अजरून पाटील, सिताराम शेट्टी, फरीदा पठाण, प्राजक्ता कुळधरण, आशा पाटील, अरविंद पाटील, मारुती दिघोडकर, चंदू पाटील, राजेश पाटील, प्रमोद बळीद, सुरेश पाटील, सोपान यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारण नसताना केलेल्या अटकेचा कामगारांनी विरोध केला आहे. पोलिस कंपनी व्यवस्थापनाला साथ देत आहे. कामगारांची देणी देण्याचा विषय न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे उल्लंघन करण्यात अदानी ग्रुपला पोलिसांची साथ असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण