शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आगरी बोली कवी संमेलनात कवींनी मांडली प्रकल्पग्रस्तांची व्यथा

By मुरलीधर भवार | Updated: December 14, 2022 20:28 IST

निमित्त होते आगरी युथ फोरम डोंबिवलीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवातील कवी संमेलनाचे.

डोंबिवली: ‘सायेब बॅनरवं दिसतान भारी’ ही प्रत्यक्ष विकास न करता फक्त बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना, साहेबांना चपराक असणारी कविता कवी किरण पाटील यांनी सादर करून समाजातील वास्तव मांडले आहे. निमित्त होते आगरी युथ फोरम डोंबिवलीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवातील कवी संमेलनाचे.

१८ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘आगरी बोली कवी संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी पुंडलिक म्हात्रे, जयंत पाटील, रामनाथ म्हात्रे, राजश्री भंडारी, किरण पाटील, निलेश म्हात्रे, संदेश भोईर, श्याम माळी सहभागी झाले होते. या संमेलनाचे समन्वयक संदेश भोईर हे होते. यावेळी गुलाब वझे, पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील यांच्या हस्ते कवींचा सन्मान करण्यात आला.

कवी पुंडलिक म्हात्रे यांनी ‘आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची’ ही प्रकल्पग्रस्थांची व्यथा मांडणारी कविता सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. जयंत पाटील यांनी ‘आगरान माझे जमीन कष्टाची तुला सांभालाची भूमिपुत्र’ हा अभंग सादर करून सर्व वातावरण भक्तीमय केले. रामनाथ म्हात्रे यांनी ‘हलद होती वाळ्य़ाची न पोर पटवली काळ्य़ाची’ , राजश्री भंडारी यांनी ‘लगीन आयलाय पोरीचा’, निलेश म्हात्रे यांनी ‘बायको गेली माहेरी’, संदेश भोईर यांनी ‘आमचे गावरान एकीच नय’, श्याम माळी यांनी ‘आमचा यो बाल्या फ्री ङोतंय’ या कविता सादर केल्या.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीfishermanमच्छीमार