शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 15:00 IST

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व महापालिका धाव घेऊ शकते. त्याआधीच पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते.

कल्याण: कल्याणडोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या प्रकरणी राज्य सरकार व महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केली होती. त्याची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकीलांकडून स्थगितीची मागणी केली असता न्यायालयो स्थगिती न देता याचिकाकर्त्यांचे म्हणने ऐकून घेतले जाईल. त्यासाठी याचिकाकर्त्यांना नोटिस दिली जाईल असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होऊ शकते.

यासंदर्भात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी माहिती दिली आहे की, १८ गावे वगळण्यात येऊ नये अशी याचिका उच्च न्यालालयात दाखल केली होती. न्यायालयाने १८ गावे वगळण्याची प्रक्रिया रद्द केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व महापालिका धाव घेऊ शकते. त्याआधीच पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. १८ गावे वगळण्यात येऊ नये यासाठी पाटील यांच्यासह संतोष डावखर, भाजप माजी नगरसेविका सुनिता खंडागळे हा देखील देखील याचिका कर्त्याना होत्या.

दरम्यान १८ गावे वगळण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे, माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सुलेख डोन यांच्यासह त्यांचे सहयोगी उल्हास जामदार यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. २७ गावातून महापालिकेस मालमत्ता व पाणी पट्टी करापोटी ३५९ कोटी रुपये येने आहे. २७ गावाला एमआयडीसी पाणी पुरवठा करते. एमआयडीसीचे पाणी बिल महापालिका भरते. हा भरणा अन्य करदात्यांनी भरलेल्या कराच्या रक्कमेतून केला जातो. २७ गावातून पाणी व मालमत्ता कराची वसूली कमी आहे. त्याचबरोबर २७ गावे २०१५ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. तेव्हा महापालिकेची  हद्द वाढली. हद्दवाढ अनुदानापोटी राज्य सरकारने महापालिकेस ७०० कोटी रुपये अनुदान द्यावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. सरकारने हे अनुदान दिलेले नाही.

कॅव्हेट दाखल असल्याने राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निकालास स्थगिती देण्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही. न्यायालयाने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांसह कॅव्हेट दाखल करणा:यांचे म्हणने ऐकून घेतले जाणार आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होऊ शकते.

१८  गावांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोप्पना तसेच न्यायमूर्ती व्ही. सुब्रमण्यम यांच्या तीन खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी मध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिके तर्फे जेष्ठ वकील अभिषेक मनू संघवी तसेच राज्य सरकार तर्फे जेष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. तसेच याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्यातर्फे जेष्ठ वकील मनोज स्वरूप व वकील दधिची म्हैसपूरकर यांनी युक्तिवाद केला. या सुनावणी मध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिका व राज्य सरकारने स्थगितीची मागणी केली परंतु सर्वोच्च न्यायालयाने सादर सुनावणी मध्ये स्थगिती न देता फक्त नोटीस काढली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका