शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 15:00 IST

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व महापालिका धाव घेऊ शकते. त्याआधीच पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते.

कल्याण: कल्याणडोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या प्रकरणी राज्य सरकार व महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केली होती. त्याची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकीलांकडून स्थगितीची मागणी केली असता न्यायालयो स्थगिती न देता याचिकाकर्त्यांचे म्हणने ऐकून घेतले जाईल. त्यासाठी याचिकाकर्त्यांना नोटिस दिली जाईल असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होऊ शकते.

यासंदर्भात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी माहिती दिली आहे की, १८ गावे वगळण्यात येऊ नये अशी याचिका उच्च न्यालालयात दाखल केली होती. न्यायालयाने १८ गावे वगळण्याची प्रक्रिया रद्द केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व महापालिका धाव घेऊ शकते. त्याआधीच पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. १८ गावे वगळण्यात येऊ नये यासाठी पाटील यांच्यासह संतोष डावखर, भाजप माजी नगरसेविका सुनिता खंडागळे हा देखील देखील याचिका कर्त्याना होत्या.

दरम्यान १८ गावे वगळण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे, माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सुलेख डोन यांच्यासह त्यांचे सहयोगी उल्हास जामदार यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. २७ गावातून महापालिकेस मालमत्ता व पाणी पट्टी करापोटी ३५९ कोटी रुपये येने आहे. २७ गावाला एमआयडीसी पाणी पुरवठा करते. एमआयडीसीचे पाणी बिल महापालिका भरते. हा भरणा अन्य करदात्यांनी भरलेल्या कराच्या रक्कमेतून केला जातो. २७ गावातून पाणी व मालमत्ता कराची वसूली कमी आहे. त्याचबरोबर २७ गावे २०१५ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. तेव्हा महापालिकेची  हद्द वाढली. हद्दवाढ अनुदानापोटी राज्य सरकारने महापालिकेस ७०० कोटी रुपये अनुदान द्यावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. सरकारने हे अनुदान दिलेले नाही.

कॅव्हेट दाखल असल्याने राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निकालास स्थगिती देण्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही. न्यायालयाने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांसह कॅव्हेट दाखल करणा:यांचे म्हणने ऐकून घेतले जाणार आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होऊ शकते.

१८  गावांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोप्पना तसेच न्यायमूर्ती व्ही. सुब्रमण्यम यांच्या तीन खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी मध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिके तर्फे जेष्ठ वकील अभिषेक मनू संघवी तसेच राज्य सरकार तर्फे जेष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. तसेच याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्यातर्फे जेष्ठ वकील मनोज स्वरूप व वकील दधिची म्हैसपूरकर यांनी युक्तिवाद केला. या सुनावणी मध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिका व राज्य सरकारने स्थगितीची मागणी केली परंतु सर्वोच्च न्यायालयाने सादर सुनावणी मध्ये स्थगिती न देता फक्त नोटीस काढली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका