शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

उल्हासनगर महापालिकेतील टेंडरवॉर संपेना, माजी उपमहापौर भालेराव यांची न्यायालयात याचिका

By सदानंद नाईक | Updated: February 27, 2024 19:44 IST

४२.५० कोटीतील तिसरे टेंडर बेकायदा दुसऱ्या ठेकेदाराला कसे दिले? असा प्रश्न रिपाइंचे भगवान भालेराव यांनी करून त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर : शासनाच्या मूलभूत सुखसुविधाच्या ४२.५० कोटीच्या निधीतून १६१ विकास कामे निविदाविना विभागून दिल्याने, यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी केला. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून शुक्रवारी याची सुनवाई असल्याची माहिती भगवान भालेराव यांनी दिली आहे. 

उल्हासनगरात हजारो कोटीचे विकास कामे सुरू असून यामध्ये १०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून दिली होती. तसेच ४२.५० कोटीच्या शासनाच्या मूलभूत सुखसुविधा मधील १६१ विकास कामाबाबत प्रश्नचिन्हे उभे केले. 

याबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांना भाजपच्या तब्बल २२ नगरसेवक व आमदार आयलानी यांनी कारवाईची लेखी मागणी केली होती. मात्र याबाबत कारवाई झाली नसल्याने, यामध्ये रिपाईने उडी घेतली. ४२.५० कोटीतील तिसरे टेंडर बेकायदा दुसऱ्या ठेकेदाराला कसे दिले? असा प्रश्न रिपाइंचे भगवान भालेराव यांनी करून त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या मूलभूत सुखसुविधेच्या ४२.५० कोटीच्या निधीतून एकून १६१ विविध विकास कामे निविदा न काढता विभागून ३ ठेकेदाराना देण्यात आली. तशीच असे अनेक कोटीचे विकास कामे दिल्याचा आरोप केला. महापालिकेत प्रशासक व आयुक्त म्हणून आयुक्त अजीज शेख हे यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचे म्हणाले. ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा योजना, १५० कोटीचे मुख्य ७ रस्त्याचे काम असे हजारो कोटीचे कामे सुरू आहेत. यामध्येही अनियमितता असल्याचा आरोपही भालेराव यांनी करून याबाबतही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे म्हणाले. 

भालेराव यांचा रोख आयुक्तांकडे? शासनाच्या मूलभूत सुखसुविधेची ४२.५० कोटीचे कामे वादात सापडल्याने, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. रिपाइंचे भालेराव यांनीही याप्रकाराला आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांचा रोख आयुक्त शेख यांच्या कारभारावर होता. 

पत्रकार परिषदेला भाजप पदाधिकारी महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही रिपाईच्या पत्रकार परिषदेला आल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी कपिल अडसूळ यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी दिली. तसेच वरिष्ठ नेत्याकडे हा विषय नेल्याचे अडसूळ म्हणाले.

 अभियंता जाधव हटाओ महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांच्या कारभारावर प्रश्नचिन्हे उठवून हटाओची मागणी केली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर