शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अंध विद्यार्थ्यांसह पालकांनी गाणी गाऊन केल्या भावना व्यक्त; ५० अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचें वाटप

By अनिकेत घमंडी | Updated: August 17, 2023 12:38 IST

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त ...

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त व्हायचं असतं. अनेक सामाजिक संस्था अलिकडच्या काळात आमच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.  सहकार्य करतात त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आम्ही अशा संस्था, लोकप्रतिनिधी यांचे आभारी आहोत, आमच्या।मुलांना देखील पुढे भविष्यात प्रगती करायची आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीने आपण कार्यरत राहू, संपर्कात राहू अशा भावना अंध विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त गाणी गाऊन व्यक्त केल्या.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी या संस्थेच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष अलंकार तायशेटे यांच्यासह प्रकल्प अध्यक्ष अजय जैन आदींनी जयहिंद अंध कल्याणकारी संस्था, अंबरनाथ या संस्थेच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मानपाडा रस्त्यावरील शुभम बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ५० शाळकरी मुलांना बॅग, छत्री, वह्या यासह शालेपयोगी वस्तूंचे वाटप केले. त्यापैकी बहुतांशी पालक हे अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे अलंकार म्हणाले, तुलनेने त्यांना रोजगाराची संधीही कमीच मिळते. तरी ते आपल्या मुलांना शाळेत शिकवून मोठे करण्यासाठी धपडत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याकरिता अशा मदतीद्वारे काहीसा हातभार लागतो, असेही अलंकार म्हणाले.

अजय जैन यांनी संस्थेद्वारे असा हा कार्यक्रम राबवण्याचे यंदाचे दहावे वर्ष आहे. माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत वह्या उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला मुलांनी व पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मुलांनी,.पालकांना गाणी गायली, कविता म्हंटल्या, व्याख्यान दिले. वातावरण पाहून काही अंध पालकांनी ही गाणी म्हणून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुलांनी त्यांच्या समाजाकडून काय अपेक्षा आहेत हे समजावून सांगितले, तर पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांना काय बनवायचे आहे याबद्दलची स्वप्न सांगून त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप शिकावे लागणार आहे, चांगला व्यक्ती बनायचं आहे असे मत व्यक्त केले. संस्थापकिय अध्यक्ष प्रकाश भराडे , महासचिव सुरेश पवार व कोषाध्यक्ष निशा रघुवंशी हे जयहिंद संस्थेतर्फे या कार्यक्रमासाठी उपस्थि होते.