शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

अंध विद्यार्थ्यांसह पालकांनी गाणी गाऊन केल्या भावना व्यक्त; ५० अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचें वाटप

By अनिकेत घमंडी | Updated: August 17, 2023 12:38 IST

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त ...

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त व्हायचं असतं. अनेक सामाजिक संस्था अलिकडच्या काळात आमच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.  सहकार्य करतात त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आम्ही अशा संस्था, लोकप्रतिनिधी यांचे आभारी आहोत, आमच्या।मुलांना देखील पुढे भविष्यात प्रगती करायची आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीने आपण कार्यरत राहू, संपर्कात राहू अशा भावना अंध विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त गाणी गाऊन व्यक्त केल्या.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी या संस्थेच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष अलंकार तायशेटे यांच्यासह प्रकल्प अध्यक्ष अजय जैन आदींनी जयहिंद अंध कल्याणकारी संस्था, अंबरनाथ या संस्थेच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मानपाडा रस्त्यावरील शुभम बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ५० शाळकरी मुलांना बॅग, छत्री, वह्या यासह शालेपयोगी वस्तूंचे वाटप केले. त्यापैकी बहुतांशी पालक हे अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे अलंकार म्हणाले, तुलनेने त्यांना रोजगाराची संधीही कमीच मिळते. तरी ते आपल्या मुलांना शाळेत शिकवून मोठे करण्यासाठी धपडत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याकरिता अशा मदतीद्वारे काहीसा हातभार लागतो, असेही अलंकार म्हणाले.

अजय जैन यांनी संस्थेद्वारे असा हा कार्यक्रम राबवण्याचे यंदाचे दहावे वर्ष आहे. माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत वह्या उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला मुलांनी व पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मुलांनी,.पालकांना गाणी गायली, कविता म्हंटल्या, व्याख्यान दिले. वातावरण पाहून काही अंध पालकांनी ही गाणी म्हणून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुलांनी त्यांच्या समाजाकडून काय अपेक्षा आहेत हे समजावून सांगितले, तर पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांना काय बनवायचे आहे याबद्दलची स्वप्न सांगून त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप शिकावे लागणार आहे, चांगला व्यक्ती बनायचं आहे असे मत व्यक्त केले. संस्थापकिय अध्यक्ष प्रकाश भराडे , महासचिव सुरेश पवार व कोषाध्यक्ष निशा रघुवंशी हे जयहिंद संस्थेतर्फे या कार्यक्रमासाठी उपस्थि होते.