शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण 

By अनिकेत घमंडी | Updated: December 25, 2023 17:02 IST

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले.

अनिकेत घमंडी ,डोंबिवली: शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे झाला, त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा, यासाठी या योजना केवळ कागदावर नसाव्यात या दृष्टिकोनातून ही विकसित संकल्प भारत यात्रा सुरू करण्यात आली आहे, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तर या यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकेल असेही ते म्हणाले. 

यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव ,सहा. आयुक्त स्नेहा करपे, चंद्रकांत जगताप इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शुभारंभाला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. त्यानंतर विकसित संकल्प भारत यात्रा शपथ उपस्थितांमार्फत देण्यात आली.

चव्हाण यांनी लाभार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या स्टॉल्सला भेटी देऊन उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला. शुभारंभानंतर सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ३३५ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.

टॅग्स :Mumbaiमुंबईdombivaliडोंबिवली