शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण 

By अनिकेत घमंडी | Updated: December 25, 2023 17:02 IST

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले.

अनिकेत घमंडी ,डोंबिवली: शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे झाला, त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा, यासाठी या योजना केवळ कागदावर नसाव्यात या दृष्टिकोनातून ही विकसित संकल्प भारत यात्रा सुरू करण्यात आली आहे, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तर या यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकेल असेही ते म्हणाले. 

यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव ,सहा. आयुक्त स्नेहा करपे, चंद्रकांत जगताप इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शुभारंभाला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. त्यानंतर विकसित संकल्प भारत यात्रा शपथ उपस्थितांमार्फत देण्यात आली.

चव्हाण यांनी लाभार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या स्टॉल्सला भेटी देऊन उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला. शुभारंभानंतर सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ३३५ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.

टॅग्स :Mumbaiमुंबईdombivaliडोंबिवली