शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

एनआरसी कामगारांचा केडीएमसी कार्यालयावर मोर्चा

By मुरलीधर भवार | Updated: February 23, 2024 15:43 IST

या मोर्चात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि माजी नगरसेवक मयूर पाटील हे सहभागी झाले होते.

कल्याण- मोहने आंबिवलीनजीक असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या वसाहतीत राहणाऱ््या कामगारांनी कल्याण डोंबिवली महापालिकेने ते राहत असलेल्या वसाहतीमधील घरे धोकादायक असल्याच्या नाेटिसा पाठविल्या आहेत. संतप्त झालेल्याकामगारांनी आज दुपारी महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढून महापालिका प्रशासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला.

या मोर्चात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि माजी नगरसेवक मयूर पाटील हे सहभागी झाले होते. आर्थिक कारण देत एनआरसी कंपनीला प्रशासनाने २००९ साली टाळे ठोकले. या कंपनीतील जवळपास ४ हजार ५०० कामगारांची थकीत देण्याचा विषय प्रलंबित आहे. कंपनीच्या थकीत देण्याचा विषय नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनलकडे न्यायप्रविष्ट आहे कंपनीच्या कामगारांना थकीत देणी मिळावीत या विषयी कामगारांनी अनेकदा मोर्चे काढले आहेत. उपोषण धरणे आंदोलन केले आहे.

दरम्यान एनआरसी कंपनीची जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर आत्ता ला’जिस्टीक पार्कचे काम सुरु आहे. मागच्या आठवड्यात पार्कच्या कामासाठी ब्लास्टींग केले गेल्याने नागरीक भयभीत झाले. वसाहतीतील कामगारांच्या घरांना ब्लास्टींगचे हादरे बसले. वसाहतीमधील कामगारांची घरे धोकादायक असल्याच्या नोटिसा महापालिका प्रशासनाकडून पाठविण्यात आल्या आहे. अदानी उद्याेग समूहाच्या दबावाला बळी पडून महापालिका प्रशासन कामगारांना आहे त्या वसाहतीमधील घरातून बेघर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या नोटीसांच्या निषेधार्थ कामगारांनी अ प्रभाग कार्यालयावर आज माेर्चा काढण्यात आला.

अदानी उद्योग समूहाने पार्कच्या कामासाठी जे ब्लास्टींग केले. त्यामुळे वसाहतीमधील कामगारांच्या घरांचे नुकसान झाले आहे. ते अदानी उद्योग समूहाने भरुन द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. कामगरांच्या थकीत देण्याचा विषय मार्गी लागलेला नाही. त्यांना अशा प्रकारे बेघर करण्याचे कारस्थान महापालिकेस हाताशी धरुन केले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक पाटील यांनी केला आहे. आमदार भोईर यांनी सांगितले की, गेल्या विधी मंडळ अधिवेशनात एनआरसी कामगारांचा प्रश्न उपस्थित केला होता. येत्या अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने अदानी उद्यागे समूहाशी चर्चा करुन कामगारांची थकीत देणी आणि घरांचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका