शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कल्याण तालुक्यातील गुरचरण जमिनीवरील हजारो अतिक्रमणधारकांना नोटिसा

By मुरलीधर भवार | Updated: November 23, 2022 16:05 IST

सात दिवसात जागा खाली करण्याचे आदेश

कल्याण- कल्याण तालुक्यातील गुरचरण जमीनीवरील अतिक्रमणधारकांना कल्याण तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत २ हजार जणांना आत्तार्पयत नोटिसा बजावून सात दिवसात जागा खाली असे बजावले आहे. अन्यथा तहसील कार्यालयाकडून कारवाई केली जाईल. या नोटिसामुळे हजारो नागरीक हवालदिल झाले आहे.

कल्याण तालुक्यात जवळपास २७ तलाठी आहे. या तलाठ्यामार्फत आत्तापर्यंत २ हजार जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. गुरचरण जमिनी या सरकारी असून त्या गुरांच्या चरण्यासाठी राखीव असतात. मात्र अनेकानी या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या प्रकरणी पंजाब राज्यातील न्यायालयात याचिका न्याय प्रविष्ट आहे. या याचिकेच्या आधारे राज्यातील गुरचरण जमीनीवर अतिक्रमण या वर्षा अखेर निष्कासीत करणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार कल्याण तहसील कार्यालयातून नागरीकाना नोटिसा पाठविण्याचे काम सुरु आहे.

कल्याण तालुक्यात १०० पेक्षा जास्त गावे आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ सहा हजार ५७१ हेक्टर इतके आहे. यापैकी गुरचरण जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. तहसील कार्यालयाकडून नोटिसा दिल्या जात असल्या तरी त्याचा पुढील निर्णय हा न्यायालय अथवा सरकार घेऊ शकते असे सरकारी यंत्रणे कडून सांगण्यात येत आहे. कल्याण पूर्व भागातील कचोरे येथे राहणारे सुभाष वर्मा यांनाही नोटिस आलेली आहे. त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत राहतात.त्यांच्या घराला महापालिकेचा टॅक्स आहे. महापालिकेस टॅक्स भरल्यावर त्यांची मालमत्ता बेकायदा कशी काय असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान माजी महापौर रमेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, हजारो लोक या गुरचरण जमीनीवर वास्तव्य करुन आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई केल्यास ते बेघर होतील. न्यायालयाचे आदेश असले तरी राज्य सरकारने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष देऊन नागरीकांना दिलासा द्यावा.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका