शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वालधुनी, अशोक नगर, आनंदवाडीतील रेल्वेच्या जागेतील घरांना नोटीसा

By प्रशांत माने | Updated: January 28, 2024 15:57 IST

पुनर्वसन होईपर्यंत घरांवर कारवाई नको:आमदार गणपत गायकवाड; रेल्वे राज्यमंत्र्यांना पाठवले पत्र.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: येथील पुर्वेतील वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर परिसरातील रेल्वेच्या जागेत राहणा-यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा रेल्वे प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान रहिवाशांच्या पुनर्वसनाचे धोरण ठरवा आणि त्यांचे पुनर्वसन होईपर्यत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश प्रशासनाला प्राधान्याने देण्यात यावेत तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.

संबंधित रेल्वेच्या जागेवर हजारो नागरीक गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन घरे बांधुन राहत आहेत. या परिसरातील रहिवाशांना रेल्वेमार्फत घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कल्याण पूर्वचे आमदार गायकवाड यांनी संबंधित रहिवाशांची भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. यावर गायकवाड यांनी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांना पत्र पाठवले आहे. वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर परिसरात अनेक वर्षापासून नागरिक राहत आहेत . केडीएमसीकडे नियमितपणे मालमत्ता कर व पाणी बिल तसेच विद्युत बिल भरत आहेत. रेल्वे कडून या रहिवाशांना नोटीसा पाठवण्यात आल्या असल्यातरी जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून कारवाई केल्यास या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

संबंधित नागरिकांनी रेल्वेने दिलेल्या नोटीसीनुसार संबंधित कागदपत्रे रेल्वे प्रशासन अधिकाऱ्याकडे जमा केली असली तरी कागदपत्रे जमा केले नसल्याचा नोटिसा त्यांना पाठवण्यात आल्या असल्याकडे गायकवाड यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबतचे धोरण ठरवुन त्यांचे पुनर्वसन होईपर्यत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश अधिका-यांना दयावेत तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करावी अशी मागणी दानवे यांच्याकडे आमदार गायकवाड यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे