शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मुंबई - कल्याण मेन लाईन, ट्रान्सहार्बरवर रविवारी लोकल फेऱ्यांत कपात नकोच

By अनिकेत घमंडी | Updated: February 28, 2024 09:51 IST

मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी.

 डोंबिवली: मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी. त्या मागण्यांमधील वस्तुस्थिती तपासून जे काही करता येईल ते करून दिलासा द्यावा. विशेषतः रविवारी कुटुंबासह प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल फेऱ्यांत कपात करू नये, हे पाऊल तातडीने उचलून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेने रेल्वे बोर्ड दिल्ली, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे टिटवाळा, बदलापूर आले तेव्हा त्यांची भेट घेत थेट पत्र देण्यात आले. त्याबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, लीना भागवत, उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी सांगितले की, सकाळ - संध्याकाळ गर्दीच्या वेळी ठाण्याहून कसारा, कर्जत खोपोलीसाठी अधिक संख्येने लोकल चालवाव्यात. दिवा पनवेल सेक्शनवर पलावा येथे टर्मिनस विकसीत करावे. कळवा व मुंब्रा स्टेशनात काही जलद लोकलना हाँल्ट असण्याची आवश्यकता. मध्य रेल्वेवर कल्याण ते टिटवाळा, बदलापूर दरम्यानच्या स्टेशनातील प्लँटफाँर्मची लांबी वाढवणे, जेथे शक्य नाही, त्या स्टेशनात डबल हॉल्टव्दारे १५ डब्या लोकलच्या संख्या चालवणे. ट्रान्सहार्बरवर ठाणे-पनवेल-ठाणे लोकलची संख्या वाढवणे.

ठाणे - नेरूळ लोकलचा विस्तार उरण पर्यंत करून, ठाणे - उरण थेट लोकल सेवा सुरू करावी. पनवेल/वाशीहून ट्रान्सहार्बर मार्गे ठाण्याला येणाऱ्या काही लोकलचा पुढे मेन लाईन मार्गे छशिमट पर्यंत विस्तार करावा. एसी लोकल सुरू केल्या आहेत, त्या वेळेत चालवाव्यात, फर्स्टक्लासचे तिकीट एसी लोककला लागू करावे, मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान दादर स्टेशनाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही स्टेशनात दुसऱ्या काँरीडाँरवर टर्मिनेशन, रिव्हरसिंग सोय असलेला होमप्लँटफाँर्म नाही.

असा होमप्लँटफाँर्म कुर्ला व ठाणे स्टेशनात विकसित करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वडाळा येथे रिव्हरसिंग ने पनवेल - गोरेगाव लोकल चालवल्या जातात, त्याच पध्दतीने ठाणे येथे रुव्हरसिंग ने वाशी/पनवेल ते कल्याण/कसारा/कर्जत दरम्यान थेट लोकल फेऱ्या सुरू करणे. त्यासाठी ठाणे स्टेशन व कळवा खाडी दरम्यान आवश्यक ते क्रॉसओव्हर बसवणे. कल्याण स्टेशन रिमोडेलिंग च्या काम अधिक वेगाने पूर्ण करणे, वसई दिवा पनवेल रोहा सेक्शनवर कमी फेऱ्यांचे वेगळे वेळापत्रक नको. तसेच वसई दिवा पनवेल दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान दर एक तासाने मेमू लोकलच्या फेऱ्या आवश्यक असल्याचे पत्रात म्हंटले आहे.