शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मुंबई - कल्याण मेन लाईन, ट्रान्सहार्बरवर रविवारी लोकल फेऱ्यांत कपात नकोच

By अनिकेत घमंडी | Updated: February 28, 2024 09:51 IST

मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी.

 डोंबिवली: मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी. त्या मागण्यांमधील वस्तुस्थिती तपासून जे काही करता येईल ते करून दिलासा द्यावा. विशेषतः रविवारी कुटुंबासह प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल फेऱ्यांत कपात करू नये, हे पाऊल तातडीने उचलून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेने रेल्वे बोर्ड दिल्ली, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे टिटवाळा, बदलापूर आले तेव्हा त्यांची भेट घेत थेट पत्र देण्यात आले. त्याबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, लीना भागवत, उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी सांगितले की, सकाळ - संध्याकाळ गर्दीच्या वेळी ठाण्याहून कसारा, कर्जत खोपोलीसाठी अधिक संख्येने लोकल चालवाव्यात. दिवा पनवेल सेक्शनवर पलावा येथे टर्मिनस विकसीत करावे. कळवा व मुंब्रा स्टेशनात काही जलद लोकलना हाँल्ट असण्याची आवश्यकता. मध्य रेल्वेवर कल्याण ते टिटवाळा, बदलापूर दरम्यानच्या स्टेशनातील प्लँटफाँर्मची लांबी वाढवणे, जेथे शक्य नाही, त्या स्टेशनात डबल हॉल्टव्दारे १५ डब्या लोकलच्या संख्या चालवणे. ट्रान्सहार्बरवर ठाणे-पनवेल-ठाणे लोकलची संख्या वाढवणे.

ठाणे - नेरूळ लोकलचा विस्तार उरण पर्यंत करून, ठाणे - उरण थेट लोकल सेवा सुरू करावी. पनवेल/वाशीहून ट्रान्सहार्बर मार्गे ठाण्याला येणाऱ्या काही लोकलचा पुढे मेन लाईन मार्गे छशिमट पर्यंत विस्तार करावा. एसी लोकल सुरू केल्या आहेत, त्या वेळेत चालवाव्यात, फर्स्टक्लासचे तिकीट एसी लोककला लागू करावे, मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान दादर स्टेशनाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही स्टेशनात दुसऱ्या काँरीडाँरवर टर्मिनेशन, रिव्हरसिंग सोय असलेला होमप्लँटफाँर्म नाही.

असा होमप्लँटफाँर्म कुर्ला व ठाणे स्टेशनात विकसित करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वडाळा येथे रिव्हरसिंग ने पनवेल - गोरेगाव लोकल चालवल्या जातात, त्याच पध्दतीने ठाणे येथे रुव्हरसिंग ने वाशी/पनवेल ते कल्याण/कसारा/कर्जत दरम्यान थेट लोकल फेऱ्या सुरू करणे. त्यासाठी ठाणे स्टेशन व कळवा खाडी दरम्यान आवश्यक ते क्रॉसओव्हर बसवणे. कल्याण स्टेशन रिमोडेलिंग च्या काम अधिक वेगाने पूर्ण करणे, वसई दिवा पनवेल रोहा सेक्शनवर कमी फेऱ्यांचे वेगळे वेळापत्रक नको. तसेच वसई दिवा पनवेल दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान दर एक तासाने मेमू लोकलच्या फेऱ्या आवश्यक असल्याचे पत्रात म्हंटले आहे.