शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

खूप काळ टिकण्यासाठी वाचन आवश्यकच : संकर्षण कऱ्हाडे 

By अनिकेत घमंडी | Updated: October 14, 2023 16:26 IST

अखंड वाचन यज्ञाचे बिगुल वाजले 

कल्याण : "वाचन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे , ते चटकन व्हायरल होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचन कायम आपल्या मनात आणि डोक्यात रहाते आणि शेवटपर्यंत आपली सोबत करते " असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते आणि कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी अखंड वाचनयज्ञच्या उद्घाटन प्रसंगी केले. 

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आणि बालक मंदिर संस्था कल्याण व सार्वजनिक वाचनालय कल्याण यांचे सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास  अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमाचे उद्घाटन  प्रसंगी त्यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत अनेक उदाहरणे आणि किस्से सांगत मुलांना हसवत वाचनाचे महत्व समजावून दिले. प्रत्येक क्षेत्रात मोठी झालेली माणसे वाचनामुळे कशी घडली हे सांगून त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजात कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

"वाचनाशी नाळ जुळणे महत्वाचे असते , एकदा का नाळ जुळली की ती  आपल्याला यश देते. वाचन हे एका दिवसापुरते न राहता ते सातत्याने केले पाहिजे " असे प्रतिपादन कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी केले.  यशोदा या साने गुरुजी यांच्या आईच्या जीवनावरील मालिकेतील बालकलाकार वरदा देवधर हिने आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की , " वाचनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे मी अभ्यास व अभिनय या दोन्ही गोष्टींची सांगड घालू शकले." 

या प्रसंगी डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या वाचनरंग या वाचन विषयक मान्यवरांच्या मुलाखती व लेख असलेले पुस्तक मान्यवरांचे प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याण चे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी , बालक मंदिर संस्था कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांची समयोचीत भाषणे झाली.

बालक मंदिर येथे आचार्य प्रल्हाद केशव नगरीमध्ये ना. धो. महानोर आणि साने गुरुजी वाचन कट्टा येथे आयोजित या उपक्रमात उद्घाटन झाल्यानंतर १५ शाळांतील १२५० विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून अभिवाचन केले तर ६५०० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घेतला. रविवार १५ ऑक्टोबर रात्री ८ वाजेपर्यंत हे वाचन सुरू राहणार असून त्यामध्ये १२०० हून अधिक वाचक आणि १५००० हून अधिक रसिक सहभागी होतील असा विश्वास अक्षरमंचचे सचिव हेमंत नेहते यांनी व्यक्त केला. सदर उपक्रमास भिकू बारस्कर , तेजस्विनी पाठक , भालचंद्र घाटे, उत्तम गायकवाड , आरती मुळे , आरती कुलकर्णी , डॉ सुनील खर्डीकर,  गीता जोशी , मच्छिंद्र कांबळे , शैलेश रेगे,  गजेंद्र दीक्षित , पुंडलिक पै, अरविंद शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण