शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

मुंबई भागात रेल्वे हेल्पलाइनवर दिवसाला येतात २५० कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:31 IST

स्वच्छतेसाठी सर्वाधिक काॅल; कोविडमुळे कॅटरिंग बंद

- अनिकेत घमंडीडोंबिवली : रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर मुंबईच्या मुख्यालयात दिवसाला २५० कॉल येतात. त्यापैकी बहुतांश कॉल हे रेल्वे डब्यातील स्वच्छतेसह एसी सुरू नसल्याबाबत किंवा गारवा कमी असल्यासंदर्भात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, तसेच त्यांना प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी विविध हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत, त्यात महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक, प्रवासातील गैरसोय तसेच प्रवासात सामान राहिले असल्यास साधारण फोन येणे अपेक्षित असते. मात्र त्या तुलनेत डब्यांमधील स्वच्छता, प्रसाधनगृहातील अस्वच्छता, पाणी नसणे अशा संदर्भात जास्त कॉल येतात. त्याखालोखाल वातानुकूलित डब्यातील एसी कार्यान्वित नसणे, असले तरी गारव्याची समस्या भेडसावणे, तसेच जनरल अथवा स्लीपरच्या डब्यातील पंखे, लाइट बंद असणे अशा समस्यांबाबतही कॉल येतात.  आरक्षित डब्यात विनाआरक्षित प्रवासी चढले आणि त्यांच्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होत असेल तर त्यासंदर्भातही कॉल येतात. बहुतांश वेळा रेल्वे डब्यात असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना प्रवासी सांगतात तेव्हा समस्या सुटण्याची शक्यता असते; पण जवान दिसले नाही तर प्रवासी थेट हेल्पलाइनवर माहिती देतात.  फेक काॅल करणाऱ्यांना शिक्षेची तरतूदकोविड १९ सुरू झाल्यापासून रेल्वेने गाड्यांमधील पॅन्ट्री (खानपान सेवा) बंद केली असल्याने गेल्या ११ महिन्यांत त्यासंदर्भातील समस्येबाबत अथवा मागणीबाबत हेल्पलाइनवर कॉल येणे बंद झाले आहे. तरीही सेवा सुरू करावी, अशी मागणी करणारे कॉल कधी तरी येतात.काही कॉल हे फेक असतात. एखाद्या प्रवाशाने थट्टा म्हणून चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्यावर लगेच कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या असतात. त्यात शिक्षेची तरतूददेखील आहे.समस्या निराकरणास तत्काळ प्रतिसादमहिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल आले तरी त्याचे निराकरण करण्यासाठी आरपीएफ, रेल्वेच्या अन्य यंत्रणा धावपळ करतात. बहुतांश डब्यांमधून सातत्याने पोलीस गस्त सुरू असते, त्यामुळे सुरक्षेसंदर्भात तुलनेने फार कमी कॉल येतात. कोणत्याही प्रवाशाला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सेवा देण्याचा प्रयत्न करते. प्रवासात प्रसूती, हृदयविकाराबाबत तातडीने मदत केली जाते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे