शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई भागात रेल्वे हेल्पलाइनवर दिवसाला येतात २५० कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:31 IST

स्वच्छतेसाठी सर्वाधिक काॅल; कोविडमुळे कॅटरिंग बंद

- अनिकेत घमंडीडोंबिवली : रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर मुंबईच्या मुख्यालयात दिवसाला २५० कॉल येतात. त्यापैकी बहुतांश कॉल हे रेल्वे डब्यातील स्वच्छतेसह एसी सुरू नसल्याबाबत किंवा गारवा कमी असल्यासंदर्भात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, तसेच त्यांना प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी विविध हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत, त्यात महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक, प्रवासातील गैरसोय तसेच प्रवासात सामान राहिले असल्यास साधारण फोन येणे अपेक्षित असते. मात्र त्या तुलनेत डब्यांमधील स्वच्छता, प्रसाधनगृहातील अस्वच्छता, पाणी नसणे अशा संदर्भात जास्त कॉल येतात. त्याखालोखाल वातानुकूलित डब्यातील एसी कार्यान्वित नसणे, असले तरी गारव्याची समस्या भेडसावणे, तसेच जनरल अथवा स्लीपरच्या डब्यातील पंखे, लाइट बंद असणे अशा समस्यांबाबतही कॉल येतात.  आरक्षित डब्यात विनाआरक्षित प्रवासी चढले आणि त्यांच्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होत असेल तर त्यासंदर्भातही कॉल येतात. बहुतांश वेळा रेल्वे डब्यात असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना प्रवासी सांगतात तेव्हा समस्या सुटण्याची शक्यता असते; पण जवान दिसले नाही तर प्रवासी थेट हेल्पलाइनवर माहिती देतात.  फेक काॅल करणाऱ्यांना शिक्षेची तरतूदकोविड १९ सुरू झाल्यापासून रेल्वेने गाड्यांमधील पॅन्ट्री (खानपान सेवा) बंद केली असल्याने गेल्या ११ महिन्यांत त्यासंदर्भातील समस्येबाबत अथवा मागणीबाबत हेल्पलाइनवर कॉल येणे बंद झाले आहे. तरीही सेवा सुरू करावी, अशी मागणी करणारे कॉल कधी तरी येतात.काही कॉल हे फेक असतात. एखाद्या प्रवाशाने थट्टा म्हणून चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्यावर लगेच कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या असतात. त्यात शिक्षेची तरतूददेखील आहे.समस्या निराकरणास तत्काळ प्रतिसादमहिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल आले तरी त्याचे निराकरण करण्यासाठी आरपीएफ, रेल्वेच्या अन्य यंत्रणा धावपळ करतात. बहुतांश डब्यांमधून सातत्याने पोलीस गस्त सुरू असते, त्यामुळे सुरक्षेसंदर्भात तुलनेने फार कमी कॉल येतात. कोणत्याही प्रवाशाला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सेवा देण्याचा प्रयत्न करते. प्रवासात प्रसूती, हृदयविकाराबाबत तातडीने मदत केली जाते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे