शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी

By अनिकेत घमंडी | Updated: May 24, 2024 17:58 IST

मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना ५० लाख रुपये द्या, कुटुंबाची मागणी

डोंबिवली -  सोनारपाडा येथे गुरुवारी अंबर (अमुदान) केमिकल कंपनीमधील स्फोटात ११ जण मृत्युमुखी तर सुमारे ६० जण जखमी झाले. त्याची दाखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. यावर स्थानिक भूमिपुत्रांनी मृत्युमुखीच्या पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि स्फोटातील नुकसान झालेल्या घरे व गाळयांचे तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी केली.

शुक्रवारी सोनारपाडा येथील श्री साईबाबा मंदिर येथे स्थानिक भूमिपुत्रांची बैठक पार पडली. या बैठकीत भूमिपुत्रांनी हा निर्णय घेतला. त्या बैठकीमध्ये गजानन पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मधुकर माळी,रतन चांगो पाटील, भाऊ पाटील, रामचंद्र पाटील, हनुमान महाराज, अजय पाटील, संदीप पालकरी, योगेश पाटील, मुरलीधर म्हात्रे, बाळाराम ठाकूर यासह स्थानिक भूमिपुत्र आणि स्फोटात ज्यांच्या घराचे व गाळ्यांचे नुकसान झाले तेही उपस्थित होते. त्यावेळी माजी नगरसेविका प्रमिला पाटील म्हणाल्या, उद्योग मंत्री उद्य सामंत हे जरी केमिकल कंपनी स्थलांतरीत करण्याच्या धोरणात्मक निर्णयावर जरी बोलले असले तरी त्यांनी त्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. रासायनिक केमिकल कंपनीचे स्थलांतर व्हावे हे ही बैठक घेण्यामागचे कारण आहे तर रतन चांगो पाटील म्हणाले, ही अत्यंत दुखद घटना आहे. मुत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.

शासनाने धनाढ्य असलेल्या कंपन्याचे सर्वे चालू केले मात्र या स्फोटात ज्यांच्या घराचे नुकसान झाले, ज्यांच्या गाळ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे अजूनही का सुरु झाले नाही.शासनाने त्वरित पंचनामेकरून त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे. भाऊ पाटील यांनी येथील रासायनिक कंपन्या स्थलांतरीत करावे अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.रामचंद्र पाटील म्हणाले, या स्फोटप्रकरणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उद्य सामंत यांची भेट घेऊ. पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. डोंबिवलीत अनेक स्फोट झाले पण आजवर  नुकसान भरपाई दिली नाही

विकास करायचा भूमिपुत्रांच्या जमिनींवर आणि भूमिपुत्रांच्या तोंडाला पाणी पुसायचे अशी शेतकरी भूमिपुत्राची झाली आहे. या स्फोटामुळे घरे आणि गाळे नुकसान झाले. पूर्वीपासून येथील भूमीपुत्रांची मागणी आहे येथील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करावे. आजवर अनेक मोठे स्फोट झाली. शासनाने येथील रासायनिक कंपनीचे स्थलांतर करून भूखंड विकासाच्या घशात न टाकता भूमीपुत्राला विकासाच्या केंद्र बिंदू समजून साडे बारा टक्के विकसित भूखंड द्यावे अशी आमची राज्य शासनाला विनंती असल्याचे गजाजन पाटील म्हणाले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीBlastस्फोट