शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महावितरणच्या गलथान कारभाराचा रहिवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:52 IST

वर्षभरात आगीच्या पाच घटना

डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी विभागामध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. वर्षभरात त्या परिसरात पाच वेळा ट्रान्सफॉर्मर स्फोट होण्याच्या व तारांना आगी लागल्याचा घटना घडल्या आहेत. परंतु, तरीही जुनाट उपकरणांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने वाढत्या अपघातांचे महावितरणला गांभीर्य नसल्याची टीका रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावरील डीपी बॉक्सची झाकणे,दरवाजे गायब झाली असून त्यांच्या केबल जमिनीचा सुरुवातीचा काही भागात वरती, उघड्यावर असल्याने यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजवाहिनीचे लोखंडी खांब आणि त्याला लटकवून टाकण्यात येणारी स्टे वायर गंजून गेल्या असून मागील कित्येक वर्षांत त्यांना रंगरंगोटी झाली नाही आहे. खांबांना आधार असणाऱ्या स्टे वायर काही ठिकाणी तुटल्याने ते खांब कधीही धोकादायक बनू शकतात. निवासी भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने या सर्वांची नियमित देखभाल, दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पण विविध कारणे सांगून महावितरण जनतेची दिशाभूल करीत आहे. वीजदेयक काही कारणाने वेळेत भरली गेली नाहीत तर लगेच वीजजोडणी तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तत्परता दाखवत असतात. पण तीच सतर्कता देखभाल, दुरुस्ती कामात का दाखवत नाही, असा सवाल त्यांनी महावितरणला उद्देशून केला. आता मोठ्या दुर्घटनेनंतर महावितरणला जाग येणार का? असेही ते म्हणाले.याबाबत मिलापनगरच्या रहिवाशांनी वारंवार महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना याची फोटोसह माहिती दिली असूनही ते यावर दुर्लक्ष करीत असल्याचे रहिवासी राजू नलावडे यांचे म्हणणे आहे. येत्या पावसाळ्यात अपघात झाल्यास त्यामुळे या ठिकाणी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण