शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

"पायाखालची वाळू सरकल्यानेच महाविकास आघाडीचा सरकारच्या विरोधात महामोर्चा"

By मुरलीधर भवार | Updated: December 17, 2022 17:41 IST

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीका

Shrikant Shinde: कल्याण-महाविकास आघाडी सरकारला जे अडीच वर्षात करता आले नाही. ते शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या पाच महिन्यात करुन दाखविले आहे. कल्याणमध्ये बेराजगारांना रोजगार देण्यासाठी महारोजगार मेळावा आयोजित केला असता महाविकास आघाडी सरकारकडून सरकारच्या विरोधात महामोर्चा काढून जनतेला वेठीस धरले जात आहे. हा विरोधाभास आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टिका कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज येथे केली. कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात गुणगोपाळ मैदानात पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी टीका केली.

यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, या आधीचे सरकार वर्क फ्रॉम होम होते. आत्ताचे सरकार प्रत्यक्षात जनतेत जाऊन काम करीत आहे. सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची तडफड होत आहे. त्यामुळेच त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा काढला आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकारकडून पायाभूत सोयी सुविधा पुरविणारे प्रकल्प उभारण्याकरीता निधी दिला जात आहे. तसेच कल्याणमध्ये महारोजगार मेळावा आयोजित करुन काम नसलेल्या हातांना काम देण्यात येत आहे.

या मेळाव्यात विविध प्रकारच्या 75 खाजगी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. विविध प्रकारच्या जॉबसाठी ६ हजार तरुण तरुणींनी त्यांची नोंदणी केली. दुपारी तीन वाजेर्पयत मान्यवरांच्या हस्ते जवळपास २ हजार ५०० तरुण तरुणांना ऑफर लेटरचे वाटप करण्यात आले. अंबरनाथ पासून ठाण्यापर्यंत आठ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे आहे. त्यांचे अपग्रेडेशन करण्याकरीता २५ कोटीचा निधी द्यावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी मंत्री लोढा यांच्याकडे यावेळी केली. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून १६० नवे उद्योगजक निर्माण होणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी योजनेतून असंघट कामगारना प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचे ५ हजार लाभार्थी शोधण्यात आले असून त्यांना ५ हजार रुपयांसह ७ हजार रुपयांचे किटही पुरविले जाणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणjobनोकरी