शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात, पहिला टप्पा ३० एप्रिलपर्यंत कार्यान्वित

By अनिकेत घमंडी | Updated: April 18, 2024 18:06 IST

बदलापूर, अंबरनाथ, कात्रपला मोठा दिलासा मिळण्याचा दावा

अनिकेत घमंडी, डोंबिवली: महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे. परिणामी महापारेषणच्या १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रपमधील ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यात मोलाची मदत मिळणार असल्याचा दावा महावितरणने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर १९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरहून रवाना होईल आणि ३० एप्रिलपर्यंत तो कार्यान्वित करण्यात येईल. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी दोन उच्चदाब वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून या वाहिन्या त्याचवेळी कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यात मोठी मदत मिळणार आहे. सध्या या भागाला मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची वाढलेली मागणी यामुळे महापारेषणकडून लोड रिलिफ मागीतला जात आहे.

जांभूळ उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्यापूर्वी स्थानिक स्तरावर उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आवश्यकतेनुसार गोवेली स्विचिंगच्या गोवेली फिडरवर मोहन सबर्बिया फिडरचा भार, १७ नंबर स्विचिंगवर कानसाई फिडरचा भार आणि आनंदनगर स्विचिंगच्या पाले फिडरवर अंबरनाथ ६ नंबर फिडरचा भार फिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून महापारेषणकडून रिलिफ मागितल्यानंतर महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होणार नाही असेही पत्रकात म्हंटले आहे.

टॅग्स :electricityवीज