शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात, पहिला टप्पा ३० एप्रिलपर्यंत कार्यान्वित

By अनिकेत घमंडी | Updated: April 18, 2024 18:06 IST

बदलापूर, अंबरनाथ, कात्रपला मोठा दिलासा मिळण्याचा दावा

अनिकेत घमंडी, डोंबिवली: महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे. परिणामी महापारेषणच्या १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रपमधील ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यात मोलाची मदत मिळणार असल्याचा दावा महावितरणने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर १९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरहून रवाना होईल आणि ३० एप्रिलपर्यंत तो कार्यान्वित करण्यात येईल. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी दोन उच्चदाब वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून या वाहिन्या त्याचवेळी कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यात मोठी मदत मिळणार आहे. सध्या या भागाला मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची वाढलेली मागणी यामुळे महापारेषणकडून लोड रिलिफ मागीतला जात आहे.

जांभूळ उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्यापूर्वी स्थानिक स्तरावर उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आवश्यकतेनुसार गोवेली स्विचिंगच्या गोवेली फिडरवर मोहन सबर्बिया फिडरचा भार, १७ नंबर स्विचिंगवर कानसाई फिडरचा भार आणि आनंदनगर स्विचिंगच्या पाले फिडरवर अंबरनाथ ६ नंबर फिडरचा भार फिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून महापारेषणकडून रिलिफ मागितल्यानंतर महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होणार नाही असेही पत्रकात म्हंटले आहे.

टॅग्स :electricityवीज