शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

होऊ द्या चर्चा कार्यक्रमास परवानगी नाकारली, ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका

By मुरलीधर भवार | Updated: October 12, 2023 20:07 IST

या याचिकेवर २ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

कल्याण - शिवसेना ठाकरे गटाकडून उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका व्यक्तिने पंतप्रधानाच्या विरोधात अपशब्द वापरल्याने ठाकरे गटाला कल्याणमधील होऊ द्या चर्चाच्या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांनी नाकारलेल्या परवानगीच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पोलिसांचे म्हणून ऐकून घेण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी दिला आहे. या याचिकेवर २ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

८ ते १५ आ’क्टोबर या दरम्यान कल्याण पश्चिम मतदार संघात विविध ठिकाणी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. त्याची रिसतर परवानगी पोलिसांकडे गटाकडून मागण्यात आली होती. पोलिसांनी त्याला परवानगी देखील दिली होती. उल्हासनगरातील वादानंतर पोलिसांनी ठाकरे गटाला दिलेली परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा निषेध कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाकडून व्यक्त केला होता. तसेच डोंबिवलीतील ठाकरे गटाकडून रविवारी मूक मोर्चा काढून काळ्या फिती लावत निषेध व्यक्त करण्यात आला.

दही हंडी उत्सव कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात साजरा करण्यासाठी ठाकरे गटाकडून परवानगी मागण्यात आली होती. त्यांना परवानगी नाकारल्याने ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाजा चौकापासून हाकेच्या अंतरावर असले्ल्या चौकात दहिहंडी साजरी करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर कल्याणच्या किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र परवानगी अद्याप दिलेली नाही. दरम्यान होऊ द्या चर्चा कार्यक्रमास दिलेली परवानगी नाकारण्यात आल्याने कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख सचिन बासरे, कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख शदर पाटील आणि डोंबिलीचे शहर प्रमुख विवेक खामकर यांनी मिळून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की, उल्हासनगरातील वादानंतर सरसकट परवानगी नाकारले योग्य नाही. घटनेने मूलभूत अधिकार दिले आहे. आमच्या अन्यायाच्या विरोधात घोषणा देणे, मोर्चा काढणे, आंदोलन करणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यावर अशा प्रकारे वारंवार गदा आणणे योग्य नाही. पोलिसांकडून अशा प्रकारे वारंवार परवानगी नाकारुन मूलभूत हक्काचे हनन केले जात आहे. न्यायालयाने याचिका दाखल करुन पोलिसांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी त्यांचे म्हणणे येत्या दोन आठवड्यात न्यायालयात सादर करावे. पोलिसांनी त्यांचे म्हणणे सादर करताच न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याण