शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

होऊ द्या चर्चा कार्यक्रमास परवानगी नाकारली, ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका

By मुरलीधर भवार | Updated: October 12, 2023 20:07 IST

या याचिकेवर २ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

कल्याण - शिवसेना ठाकरे गटाकडून उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका व्यक्तिने पंतप्रधानाच्या विरोधात अपशब्द वापरल्याने ठाकरे गटाला कल्याणमधील होऊ द्या चर्चाच्या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांनी नाकारलेल्या परवानगीच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पोलिसांचे म्हणून ऐकून घेण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी दिला आहे. या याचिकेवर २ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

८ ते १५ आ’क्टोबर या दरम्यान कल्याण पश्चिम मतदार संघात विविध ठिकाणी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. त्याची रिसतर परवानगी पोलिसांकडे गटाकडून मागण्यात आली होती. पोलिसांनी त्याला परवानगी देखील दिली होती. उल्हासनगरातील वादानंतर पोलिसांनी ठाकरे गटाला दिलेली परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा निषेध कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाकडून व्यक्त केला होता. तसेच डोंबिवलीतील ठाकरे गटाकडून रविवारी मूक मोर्चा काढून काळ्या फिती लावत निषेध व्यक्त करण्यात आला.

दही हंडी उत्सव कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात साजरा करण्यासाठी ठाकरे गटाकडून परवानगी मागण्यात आली होती. त्यांना परवानगी नाकारल्याने ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाजा चौकापासून हाकेच्या अंतरावर असले्ल्या चौकात दहिहंडी साजरी करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर कल्याणच्या किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र परवानगी अद्याप दिलेली नाही. दरम्यान होऊ द्या चर्चा कार्यक्रमास दिलेली परवानगी नाकारण्यात आल्याने कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख सचिन बासरे, कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख शदर पाटील आणि डोंबिलीचे शहर प्रमुख विवेक खामकर यांनी मिळून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की, उल्हासनगरातील वादानंतर सरसकट परवानगी नाकारले योग्य नाही. घटनेने मूलभूत अधिकार दिले आहे. आमच्या अन्यायाच्या विरोधात घोषणा देणे, मोर्चा काढणे, आंदोलन करणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यावर अशा प्रकारे वारंवार गदा आणणे योग्य नाही. पोलिसांकडून अशा प्रकारे वारंवार परवानगी नाकारुन मूलभूत हक्काचे हनन केले जात आहे. न्यायालयाने याचिका दाखल करुन पोलिसांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी त्यांचे म्हणणे येत्या दोन आठवड्यात न्यायालयात सादर करावे. पोलिसांनी त्यांचे म्हणणे सादर करताच न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याण