शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

By मुरलीधर भवार | Updated: May 27, 2024 16:42 IST

अपघातग्रस्त अमूदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली.

मुरलीधर भवार, डोंबिवली:डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी दोषी अधिकारी वर्गाच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे.

अपघातग्रस्त अमूदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली. या वेळी त्यांनी कंपनी परिसराची पाहणी केली. कामगार मंत्री खाडे यांनी सांगितले की, कंपनीतील रिअ‍ॅक्टरमुळे हा स्फाेट झाला आहे. हे प्रथमदर्शनी आढळून येते. त्याठिकाणी बॉयलरचा काही संबंध नाही. कंपनतीली रिॲक्टर कसा आणि का फुटला याची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्या विराेधात कारवाई केली जाणार आहे. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६४ जण जखमी झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केले आहे. जे कामगार मृत या स्फेटात मृत्यूमुखी पडले. त्यांचे वय आणि त्यांची कंपनीतील सेवा वर्षे याची माहिती घेऊन कंपनी मालकाकडून त्यांना त्यांचे लाभ देण्यासाठी कामगार आयुक्त विभागाकडून आदेशित केले जाणार आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्याठिकाणी एक मोठा खड्डा पडला आहे. तसेच आसपासच्या सात कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या कंपन्यातील कामगारही मृत्यूमुखी तर काही जखमी झाल्याची माहिती आहे .

अपघातग्रस्त अमूदान कंपनीचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते का ? हा प्रश्न खाडे यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, सेफ्टी ऑडिट झाले होते असे त्यांनी सांगितले. मात्र झाले होते की नाही ते तपासले जाईले असेही ते म्हणाले. दर दोन वर्षांनी कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट केले जाते. त्यात काही त्रूटी आढळून आल्यास त्या त्रूटी दूर करण्सास सांगितले जाते. त्या त्रूटी दूर केल्या नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया सुरु असते. आत्ता अमूदान कंपनीतील स्फोटाच्या घनटेनंतर पुन्हा कंपन्यांनी सेफ्टी ऑडिट केले गेले आहे की नाही हे तपासले जाईल.

डोंबिवलीतील १५६ कंपन्या धोकादायक आहेत. त्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला होता. त्याचे पुढे काय झाले याची विचारणा खाडे यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, धाेकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मात्र कंपन्या अन्यत्र हलविणे कंपनी मालकांना सोयस्कर आहे की नाही हे देखील जाणून घेतले जाणार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोट